रत्नागिरी : महाराष्ट्रातील कोकणातील राजकारण सध्या चांगलचं तापलं आहे. शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव आणि राणे कुटूंबियांमध्ये सातत्याने जोरदार टिका टिप्पणी केली जात आहे. यात आता भाजपने देखील उडी घेतली आहे. भाजपाकडून संविधान समर्थन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्या रॅलीत भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी भास्कर जाधव यांच्यावर कडाडून हल्लाबोल केला आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
भास्करचा आता सुर्योदय नाही तर सुर्यास्त जवळ आला आहे. तर वैभव नाईक यांचे वैभव जाऊन भाजपचे वैभव कुडाळ विधानसभेमध्ये निश्चितपणे उदयास येईल, असा विश्वास देखील प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला आहे. तसेच नाईक व जाधव आणीबाणीच्या गोष्टी करतात आणि देशात आणीबाणी लावणाऱ्या त्या काॅंग्रेस पक्षाच्या मांडीला मांडी लावून त्या ठिकाणी बसात. या देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जनतेने मान्य केले आहे. तर कोकणच्या जनतेने मंत्री नारायण राणेंचे नेतृत्व मानले आहे. त्यामुळे आमच्या नेतृत्वावर वेडंवाकडं बोलाल तर तुम्हाला जशाच तसे उत्तर दिले जाईल. असंही ते म्हणाले
चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
आम्ही संविधान घेऊन चालतो. डॉ.बाबासाहेबांनी आम्हाला कायद्याचं पालन करायला शिकवलं. त्यामुळे संविधानाचा अपमान,लोकशाहीला तुडविणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही. ज्याला ठोकायचा असेल तर ठोकू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. तसेच चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधव यांना ठोकू असा इशारा देखील प्रवीण देरकर यांनी दिला आहे.
Read also
- “मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
- “कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- “स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
- “राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
- नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”