पुणे : महाराष्ट्रातील गुंतवणुक मध्यप्रदेशात जाण्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यातच आता पुण्यातील गुंतवणुक दारांना मध्यप्रदेशमध्ये आकर्षित करण्यासाठी इन्हेस्ट एमपी या परिषदेच आयोजन करण्यात येत आहे. यासाठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चव्हाण मुंबईत येत आहे. यावरून काॅंग्रेसने राज्य सरकारवर प्रखरशब्दात टिका केली आहे.
चंद्रकांत पाटलांची भूमिका म्हणजे भाजपाला घरचा आहेर : चेतन बेंद्रे
या परिषदेनंतर शिवराज सिंह संजय किलोस्कर, बाबा कल्याणकर, अश्विनी मल्होत्रा या उद्योजकांशी संवाद साधणार आहेत. इतर राज्यातून मध्यप्रदेशमध्ये गुंतवणुक व्हावी. यासाठी मध्य प्रदेश सरकार असे कार्यक्रम राबवित असल्याचं शिवराज सिंह यांनी म्हटलं आहे. काही दिवसापासून वेदांता प्रकल्पावरून राज्यात विरोधकांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला होता.
“ठाकरे सरकारचा ‘तो’ निर्णय ही शिंदे सरकारने बदलला”;
वेदांता प्रकल्पानंतर अजून महाराष्ट्रातील प्रकल्प आता महाराष्ट्राबाहेर जाणार का ? अशी चर्चा रंगली लागली आहे. यावर महाराष्ट्राची ही लुटमार कधीपर्यंत सहन करायची? शिंदे-फडणवीसांना महाराष्ट्राचे नुकसान स्वत: च्या राजकीय फायद्यापेक्षा छोटे वाटते का ? असा खोचक सवाल काॅंग्रेसने केला आहे. तसेच आधी लपुनछपून महाराष्ट्रातील उद्योग पळवत होते. आता उघड उघड महाराष्ट्रातील उद्योग पळवत आहेत. अशी टिका देखील काॅंग्रेसने केली आहे.
“मी गुवाहाटीला गेलो असतो तर या लोकांनी मला शेण घातलं असतं”; देवेंद्र भुयार
मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार आहेत? असा खोचक सवाल देखील उपस्थित केला आहे. वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारविरोधात रान पेटवलं होतं. त्यामुळे या प्रकरणावरून देखील आता सत्ताधारी आणि विरोधकांना खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
Read also
- “कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- “स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
- “राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया
- नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
- “शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”