मुंबई : सध्या देशात एव्हाना महागाई, बेरोजगारी इत्यादी समस्यांनी नागरिक हैरान झाले आहेत. अनेक तरूणांना रोजगार उपलब्ध नसल्याने तरूण वर्ग देखील हैरान झाला आहे. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदांमधील 13 हजार 521 पदांची जिल्हा परिषद भरती रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने राष्ट्रवादीने त्यांच्यावर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे.
नाशिक- पुणे रेल्वे प्रकल्पाला ब्रेक..! अमोल कोल्हे संतापले, म्हणाले, “इतके दिवस मग काय…;”
फडणवीसांनी 2019 निवडणुकीआधी काढलेली 13,521 पदांची जिल्हा परिषद भरती काल तडकाफडकी रद्द केली. बेरोजगारांची दिवाळी अंधारमय करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध. खोके सरकार या 20 लाख बेरोजगारांचे अर्जापोटी घेतलेले करोडो रूपये कधी परत करणार ? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
“शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी अंधकारमय केली”
भरती प्रक्रिया रद्द कऱण्याचा निर्णय ग्रामविकास खात्याकडून घेण्यात आला आहे. अर्जदारांच्या तपशीलामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे ही परिक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या भरती प्रक्रियेसंदर्भातील माहितीच ग्रामविकास विभागाकडून गहाळ झाल्याने राज्य सरकारने हा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे भरतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या तरूणांचा हिरमोड झाला असून सगळीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Read also
- “चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
- “मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
- “कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
- “स्वत; उद्धव ठाकरे मैदानात आले की भाजपचा पालापोचाळा होईल”
- “राजकारणात केव्हाही काहीही होऊ शकतं”; शिंदे, फडणवीस अन् ठाकरे भेटीवर भाजपची प्रतिक्रिया