मुंबई : वेदांता फॉक्सकॉननंतर आता नागपुर येथे साकारण्याचा प्रस्ताव असलेला संरक्षण क्षेत्रातील टाटा समुहाचा एअरबस प्रकल्पही गुजरातला गेला आहे. त्यावरून आता राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी सत्ताधारी नेत्यांवर कडाडून प्रहार केला आहे. यावरून राष्ट्रवादी काॅंग्रेस रूपाली पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टिका केली आहे.
“चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
महाराष्ट्रातील चौथा प्रकल्प गुजरातला महाराष्ट्रातील तरूणांचे भविष्य विकायचे कंत्राट मुख्यमंत्री परफेक्ट चालू आहे. यासाठी इडी स्थापन केले का ? असा खोचक सवाल देखील रूपाली पाटील यांनी केला आहे. तसेच पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महाराष्ट्रातील वाट लावण्याची नियोजित काम चालू आहे. इडी केंद्र भाजप सरकार टाटा प्रकल्प असं म्हणत त्यांनी शिंदे सरकारला धारेवर धरलं आहे.
“मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ह्या प्रकल्पाबाबत सप्टेंंबरमध्ये घोषणा केली होती. हा प्रकल्प नागपुरातील मिहानमध्ये साकारण्यात येणार होता. मात्र आता 22 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा हा प्रकल्प गुजरातला गेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या प्रकल्पाचे भुमिपुजन 30 आक्टोंबरला करणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील एक एक प्रकल्प गुजरातला जात असल्याने विरोधकांनी सत्ताधारी पक्षांवर टिकेची राळ उडवली आहे.
“कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
दरम्यान, या प्रकल्पावरून भाजपने देखील विरोधी पक्षाला प्रत्युत्तर दिलं आहे. 24 सप्टेंबर 2021 रोजी करार झाला. त्यानंतर हा प्रकल्प महाराष्ट्रात आणण्यासाठी एकही पत्र महाविकास आघाडी सरकारने दिलं नाही. वा कोणताही पाठपुरावा केला नाही. असं भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातून मेगा प्रकल्प गुजरातला हस्तांतरीत करण्यासाठीच भाजपने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपदावर बसवले आहे. आता टाटा एअरबस प्रकल्पही गुजरातमध्ये गेला असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तापसे यांनी निशाणा साधला आहे.
Read also
- “देवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांच्या गाजराचे उदंड पीक”; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- बळीराजाला मदत करणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात..! उद्या मराठवाड्याचा दौरा
- “भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”
- “तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
- “महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध..” जिल्हा परिषदेतील 13,521 पदांची भरती रद्द केल्याने राष्ट्रवादी आक्रमक