मुंबई : 2019 हे निवडणुक वर्ष म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी 72000 जागांची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात ती भरती ही केवळ 8 ते 10 हजार पदांसाठीच झाली. त्यानंतर 2022- 2024 विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर डोळा ठेवून देवेंद्र फडणवीस सरकारची पुन्हा एकदा 75000 मेगा भरती घेणाऱ असल्याची घोषणा केली होती. मात्र प्रत्यक्षात स्थिती हे वेगळीच असून देवेंद्र फडणवीस सरकारचे घोषणांच्या गाजराचे उदंड पीक आहे. असा शाब्दिक हल्ला राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
“मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
फडणवीसांनी 2019 निवडणुकीआधी काढलेली 13,521 पदांची जिल्हा परिषद भरती काल तडकाफडकी रद्द केली. बेरोजगारांची दिवाळी अंधारमय करणाऱ्या या महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध. खोके सरकार या 20 लाख बेरोजगारांचे अर्जापोटी घेतलेले करोडो रूपये कधी परत करणार ? असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी केला आहे.
“कृषीमंत्र्यांनी थातुरमातूर दौरे करून शेतकऱ्यांची टिंगल केली”; राष्ट्रवादीची जहरी टिका
दरम्यान, 2019 आलेली 13, 514 पदांची जिल्हा परिषदमधील पदांची जाहिरात ही सन 2022 मध्ये रद्द करत पुन्हा, नव्या ब्रॅंडसहित प्रसिद्ध केली जाते व त्याला मेगाभरती म्हणतात. युवकांच्या आकांक्षांचे दुश्मन देवेंद्र फडणवीस आहेत. असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
Read also
- बळीराजाला मदत करणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात..! उद्या मराठवाड्याचा दौरा
- “भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”
- “तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले
- “महाराष्ट्रद्रोही सरकारचा जाहीर निषेध..” जिल्हा परिषदेतील 13,521 पदांची भरती रद्द केल्याने राष्ट्रवादी आक्रमक
- “चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा