मुंबई : राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी घोषीत केलेला टाटा समुहाचा एअबस प्रकल्पही आता गुजरातला गेला आहे. तब्बल 22 हजार कोटी रूपये गुंतवणुकीचा असलेला हा प्रकल्प गुजरातला गेल्याने सत्ताधारी पक्षांवर विरोधकांनी टिकेची झोड उठविली आहे. वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर आता हाही प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर जात असल्याने अनेकांनी यावर संताप व्यक्त केला आहे.
राज्याचे माजी पर्यावरण मंत्री आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील यावरून राज्य सरकारवर टिका केली आहे. खोके सरकारने अजून एक प्रकल्प महाराष्ट्राबाहेर घालवला आहे. टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाऊ नये ह्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी आम्ही जुलै महिन्यापासून सातत्याने करत होतो. पण पुन्हा तेच झालं. असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
“चिपळूनमध्ये येऊन भास्कर जाधवांना ठोकून काढू”; प्रवीण दरेकरांचा इशारा
पुढे बोलताना ते म्हणाले की, गेल्या तीन महिन्यापासून सातत्याने महाराष्ट्रातले प्रकल्प बाहेर का जात आहेत? खोके सरकारवर उद्योगजगताचा विश्वास उरलेला नाहीय. हे तर दिसतच आहे. आता 4 प्रकल्प महाराष्ट्रातून निसटल्यावर तरी उद्योगमंत्री राजीनामा देणार का ? असा खोचक सवाल देखील आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारला केला आहे. त्यामुळे आता राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.
“मोदींना खुश करण्यासाठी शिंदे-फडणवीस महाराष्ट्राला अजून किती लुटू देणार”?
दरम्यान, या प्रकरावरून काॅंग्रेसने देखील राज्य सरकारचा खुरपुस समाचार घेतला आहे. वेदांता फॉक्सकॉननंतर आता नागपुर येथे साकारण्याचा प्रस्ताव असलेला प्रकल्प गुजरातला गेला आहे. प्रश्न असा आहे की, महाराष्ट्रातील प्रत्येक प्रकल्प गुजरातमध्येच का जातो? ओडिशा, पंजाब, आसाम, कर्नाटकमध्ये का जात नाही.? गुजरातमध्ये का जातो? असा सवाल काॅंग्रेसने केला आहे.
Read also
- “महाराष्ट्राची वाट लावण्याचे नियोजित काम सुरूय”; रूपाली पाटलांचा शिंदेंवर हल्लाबोल
- “देवेंद्र फडणवीस सरकारच्या घोषणांच्या गाजराचे उदंड पीक”; राष्ट्रवादीचा हल्लाबोल
- बळीराजाला मदत करणाऱ्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात..! उद्या मराठवाड्याचा दौरा
- “भाजप अन् मनसेचं नातं लिव्हइन रिलेशिनशिप जोडप्यासारखं”
- “तुझ्या वडिलांना देखील धुळ चारली आहे, तुला पण..”; आमदार वैभव नाईक भडकले