मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेत आहेत. या भेटीत मराठा आरक्षण या महत्त्वाच्या विषयासह विविध मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे सुद्धा मोदींना भेटणार आहेत. या भेटीकडे मराठा समाजासह संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहेच, शिवाय महाराष्ट्रातील राजकीय पक्षही या भेटीकडे लक्ष ठेवून आहेत.
शिवसंग्रामप्रतिष्ठानचे नेते विनायक मेटे यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींची घेतलेली भेट म्हणजे केवळ मराठा आरक्षणाचा मुद्दा ढकलाढकलीचे राजकारण आहे. आरक्षणाचा मारेकरी कोणाला ठरवायचे?, असा या भेटीमागचा उद्देश मुख्यमंत्री ठाकरेंचा आहे, असा आरोप मेटे यांनी केला आहे.
आम्ही मोर्चा काढला, संभाजीराजेंनी मोर्चाची घोषणा केली. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणा होऊ नये. शिवाय मोर्चाच्या घोषणेनंतर अडगळीत येणार हे लक्षात आल्याने मुख्यमंत्र्यांनी तात्काळ हातपाय हालवण्याकडे लक्ष दिले आहे, परंतू, हे केवळ ढकलाढकलीचे राजकारण आहे, असे मेटे यांनी सांगितले.
Read Also :
- उद्धव- मोदींच्या भेटीवर चंद्रकांत पाटील-फडणवीस शकुनी डाव टाकणारच
- ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल – संजय राऊत
- पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंमधील बैठकीला सुरुवात
- मुंबईच्या मधोमध जंगल फुलणार, ‘आरे’ची 286 हेक्टर जागा वनविभागाकडे सुपूर्द
- ‘… म्हणून पंतप्रधान मोदींनी मोफत लसीकरणाची जबाबदारी घेतली’