औरंगाबाद : शिवसेनेकडून युतीचे सरकार असतानाही ‘औरंगाबाद’ शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करावे, अशी मागणी सातत्याने होत होती. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आहे, असे असतानाही शिवसेनेकडून नामकरणाची मागणी सारखी होत आहे. त्यातच आता औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पुन्हा एकदा नामांतराची मागणी केली आहे.
हर्षवर्धन पाटलांची कन्या ४ मागण्यांचे निवेदन घेऊन राज्यपाल कोश्यारी यांच्या भेटीला
“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ‘औरंगाबाद’चे नाव ‘संभाजीनगर’ केले होते. आता त्यांचे सुपुत्र उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांच्यामागे भक्कमपणे त्यांच्या निर्णयाला पाठिंबा देणारे दोन पक्ष आहेत. त्यामुळे, शहराचे नाव ‘संभाजीनगर’ करण्याबाबत शिवसेना गंभीर असून, हीच ती योग्य वेळ आहे,” असे विधान त्यांनी औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना केले आहे. दरम्यान, त्यांच्या विधानामुळे आता महाविकास आघाडीत पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
बैलगाडा शर्यत सुरु करण्यासाठी मी राजकीय आत्महत्या करण्यास तयार, खासदार अमोल कोल्हेंची आक्रमक भूमिका
तसेच, “मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळातील सर्व नेते याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतील. नक्कीच काही तांत्रिक बाबी आड येत आहेत. मात्र त्यावरही तोडगा निघेल. आम्ही यापुर्वीच विभागीय आयुक्तांना तसा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे, आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता शिवसेना नेत्यांकडून पुन्हा एकदा नामकरणाचा मुद्दा हळूहळू पुढे येऊ लागल्याने, शिवसेना पुन्हा एकदा हाच अजेंडा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे का?, असा सवाल उपस्थित होत आहे.
शिवसेना खासदार गवळींच्या कार्यालयात तब्ब्ल ७ कोटी आले कुठून? भाजपचा सवाल
दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्यातील जवळजवळ सर्वच राजकीय पक्षांनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असून, त्यामुळे सगळेच पक्ष निवडणुकीत आपला संपूर्ण जोर लावणार आहेत. मात्र, निवडणुकांच्या निकालांनंतर कोण कोणासोबत युती करतो आणि कोण कोणासोबत आघाडी हे पाहणे औत्सुक्याचे रहाणारे आहे.
Read Also :
- “मुख्यमंत्री मरू द्या”, वक्तव्य करणाऱ्या पालकमंत्री दत्तात्रय भरणेंचा अखेर माफीनामा
- ताकद पहायची असेल तर दत्तात्रय भरणेंनी उजनी धरण ओलांडून दाखवाव – शिवसेनेने दिला दम
- “मुख्यमंत्री मरू द्या”, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जीभ घसरली
- बाबासाहेबांनाही कधी वाटलं नसेल, भविष्यात असे राज्यपाल येतील म्हणून; हसन मुश्रीफांचा कोश्यारींवर घणाघात
- १२ सदस्यांच्या यादीवर राज्यपालांनी अजित पवारांचा काढला चिमटा; काँग्रेस नेत्याला खडेबोल सुनावले