– राष्ट्रवादी, शिवसेनेच्या आजी-माजी खासदारांच्या कुरघोड्यांनी गालबोट
पुणे : गेल्या ११ वर्षांनंतर राज्यातील बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करून पहिली ‘बारी’ बसवण्याचा खटाटोप महाविकास आघाडी आणि शिरुरच्या आजी-माजी खासदारांच्या चांगलाच अंगलट आला. ओमिक्रॉनचे कारण देत वर्षाच्या सुरूवातीलाच मावळ आणि लांडेवाडी येथील शर्यत रद्द करावी लागली. राजकीय गणिते न जुळल्यामुळेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी बारीतून पळ काढला. त्याला प्रशानसच्या नियमावलीची मलमपट्टी लावण्यात आली. त्यामुळे महाराष्ट्रातील बैलगाडा शौकीनांमधून संताप व्यक्त होत आहे.
कोरोनाने पुन्हा एकदा नेत्यांना घेरले आणि तेच ठरतायेत ‘सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना’?
सर्वोच्च न्यायालयाने बंदी उठविल्यानंतर राज्यातील पहिली बैलगाडा शर्यत आज (शनिवारी) तळेगाव दाभाडे एमआयडीसीजवळ नाणोली तर्फे चाकण येथे होणार होती. मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या बैलगाडा शर्यतीस प्रमुख उपस्थिती म्हणून शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार होते. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सशर्त परवानगी दिली होती. त्यामुळे नाणोलीच्या दत्त जयंती उत्सवात तब्बल आठ वर्षांनी बैलगाडे धावणार होती. अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढ्यानंतर प्रथमच बैलगाडा शर्यतीचे आयोजन होत असल्याने बैलगाडा मालक व शौकिनांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते, तथापि ऐनवेळी शर्यत रद्द झाल्यामुळे हिरेमोड झाला.
राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
दुसरीकडे, कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी चिचोडी- आंबेगाव आणि नानोलीतर्फे चाकण ता. मावळ येथील बैलगाडा शर्यतीची परवानगी पुढील आदेश येईपर्यंत स्थगित ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश आहेत. यावर, शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नांगरे पाटील आणि भरत आंधळे यांच्या भाषणांमुळे जसा चांगल्या युवकांचा एक वर्ग वाया गेला तसाच एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय.
— Adv. Bhushan Raut – अॅड. भूषण राऊत (@AdvBhushanRaut) December 30, 2021
‘‘ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करून बैलगाडा मालकांचा हिरमोड झाला आहे, परंतू, शर्यत झाली असती तर माझे नाव झाले असते, त्यामुळे, ऐनवेळी शर्यत रद्द करण्याचा घाट घातला, यामागे राजकीय षडयंत्र असल्याचे दिसून येते’’, अशा शब्दात आढाळाराव पाटलांनी रोष व्यक्त केला. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेना नेत्यांच्या रस्सीखेचमध्ये अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेली बैलगाडा शर्यत अखेर झालीच नाही. त्यामुळे पुणे जिह्यातील ग्रामीण भागातून राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कुरघोड्यांचा निषेध व्यक्त होत आहे.
काय आहे राजकीय गणित…
उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जिल्हाधिकारी यांनी केलेल्या विनंतीनुसार मावळातील ही शर्यत रद्द केल्याचे आमदार सुनील शेळके यांनी म्हटले आहे. वास्तविक, मावळ लोकसभेतील २०१९ चे उमेदवार पार्थ पवार यांना आमदार शेळके यांनी शर्यतीसाठी निमंत्रित करणे अपेक्षीत होते. मात्र, आमदार शेळके यांनी शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना पाचारण केले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ पातळीवर नाराजी आहे. दुसरीकडे, याच दिवशी शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी लांडेवाडीत शर्यतीची घोषणा केली होती. गेल्या आठ-दहा दिवसांपासून आढळराव पाटलांची जय्यत तयारी सुरू होती. त्यामुळे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी ओमिक्रॉनच्या नावाखाली प्रशासनाला हाताशी धरून आढळराव पाटलांची ‘बारी’ घाटात उतरण्यापूर्वीच फेल केली, अशी चर्चा रंगली आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्याने ऐनवेळी उधळली मुक्ताफळे….
दरम्यान, एका बाजूला राष्ट्रवादीचे नेते शर्यतीचे आयोजन करत आणि बैलगाडा शर्यत सुरू करण्याबाबत आम्ही कसे योगदान दिले. याचे दाखले देत असतानाच दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रवक्ते भूषण राऊत यांनी केलेले एक ट्वीट सध्या बरेच चर्चेत आले आहे. ते म्हणाले आहेत की, ‘‘नांगरे-पाटील आणि भरत आंधळे यांच्या भाषणांमुळे जसा चांगल्या युवकांचा एक वर्ग वाया गेला तसाच एक वर्ग बैलगाडा शर्यतींमुळे वाया जाणार असं दिसतंय.’’ त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांना बैलगाडा शर्यतीचा किती जिव्हाळा आहे, हे स्पष्ट होते. गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली बैलगाडा शर्यत शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकारणापायी पुन्हा अडचणीत येवू नये, अशी अपेक्षा आता शेतकरी आणि बैलगाडा मालक, शौकीनांमधून व्यक्त होत आहे.
Read also:
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके
- बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
- दिलीपराव देशमुखांचा हट्ट पुतण्याने पुरवला; लातूरच्या शेतकऱ्यांना ५ लाख रुपये पर्यंत पीक कर्ज शून्य टक्के दराने मिळणार