मुंबई : देशात लसीकरण मोहिमेचे तीन तेरा वाजले आहेत. लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहीमेत अनेक अडथळे येत आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमध्ये समन्वय नसल्याने हा लसींचा तुटवडा अनेक राज्यांमध्ये जाणवत असून, यावरून दोन्ही स्तरावरच्या सरकारांमध्ये खडाजंगी सुरु आहे. मात्र, यादरम्यान देशाला बसलेला महामारीचा विळखा आणखीन घट्ट होत चालला आहे.
देशात एकीकडे बाधित रुग्णांची संख्या घटत चालली असली, तरी मृतांचा आकडा मात्र वाढतच चालला आहे. मंगळवारी देशात आत्तापर्यंतच्या सर्वात जास्त महामारीने बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, या भयानक वास्तवाला छेद देण्यासाठी, केवळ आणि केवळ लसीकरण हाच एकमात्र प्रभावी उपाय असल्याचं तज्ज्ञांकडून वारंवार सांगितलं जात आहे.
या पार्श्ववभूमीवर मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, देशात लसींचा तुटवडा दूर करुन, लसींचं उत्पादन कशाप्रकारे वाढवता येऊ शकतं, यासाठीचा एक नवा पर्याय सुचवला आहे. “देशातील बाकी लस बनवणाऱ्या कंपन्यांना देखील महामारीवरील प्रतिबंधात्मक लस बनवण्याचा परवाना दिला जाण्याची गरज असल्याचं मत, त्यांनी मांडलं आहे.
Y'day while participating at the conference, I had made a suggestion to ramp up vaccine production. I was unaware that before my speech Minister for Chemical & Fertilizers Mansukh Mandaviya had explained govt’s efforts to ramp up vaccine production: Union Minister Nitin Gadkari pic.twitter.com/CvomcR7y47
— ANI (@ANI) May 19, 2021
“लसींची मागणी पुरवठ्यापेक्षा जास्त असल्याने जर अपुऱ्या पुरवठ्याची समस्या निर्माण होत असेल, तर एका कंपनीला लस निर्मितीचा परवाना देण्याऐवजी आणखी १० कंपन्यांना लसनिर्मिर्तीचे परवाने द्या. आवश्यकतेनुसार त्यांना देशात पुरवठा करु द्या आणि नंतर जास्त लसनिर्मिती झाल्यास, ते या लसी निर्यात करु शकतात. हे १५ ते २० दिवसांत केले जाऊ शकते,” अशी उपयुक्त कल्पना नितीन गडकरी यांनी केंद्र सरकारला सुचवली आहे. तसेच, औषधाचं पेटंट असलेल्यांना इतर काही औषध कंपन्यांद्वारे १० % रॉयल्टी देण्याची व्यवस्था करण्यात यावी, असा सल्लाही त्यांनी केंद्राला दिला आहे.
तसेच, बिहार-उ.प्रदेशात अंत्यसंस्कारासाठी जास्त पैसे मोजावे लागत असल्याने, नागरिकांकडून मृतदेह गंगेत सोडण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर आणि देशभरातून यावर अनेक सवाल उपस्थित केले गेल्यानंतर, सर्व तक्रारींची दखल घेऊन, “चंदनाऐवजी डिझेल, इथेनॉल आणि बायोगॅस आणि विजेचा वापर केला गेल्यास, अंत्यसंस्कार करणे स्वस्त होईल”, त्यामुळे या संबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे मांडला असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
Read Also :
- मराठा आरक्षण.! ही मोर्चे काढण्याची वेळ नाही – संभाजीराजे
- ठरलं तर मग.! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौरा करणार
- नितीन गडकरी भावी पंतप्रधान? काँग्रेसच्या बड्या नेत्याचे मोठे वक्तव्य
- ‘महाराष्ट्राला गुजरातसारखी वागणूक मोदींकडून का दिली जात नाही?’ मालिकांचा सवाल
- ‘काँग्रेसकडून दरवेळी भारतविरोधी भूमिका का घेतली जाते?’