नवी दिल्ली : महाविकास आघडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्याच्या राजकारणात अनेक प्रकारच्या घडामोडी सातत्याने घडत आहेत. एकीकडे विरोधी पक्ष बदला घेण्याच्या हेतूने आक्रमक होऊन, महाविकास आघाडी सरकरावर सातत्याने हल्लाबोल करत आहे. त्यासाठी छोट्यातली छोटी संधी देखील भाजप सोडत नाहीये.
संसदीय समितीच्या बैठकीत मोदींनी उठवले, काँग्रेसच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह, म्हणाले…
दुसरीकडे महाविकास आघाडीत सारं काही आलबेल सुरू असल्याचं सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आत्तापर्यंत ठाकरे सरकारमधल्या कुरबुरीच्या अनेक छोट्या-मोठ्या घटना समोर आल्या असून, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या स्वबळाच्या घोषणेनंतर आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यावर केलेल्या फोन टॅपिंगच्या आरोपनंतर मात्र, काँग्रेस आणि महाविकास आघडीत नाराजीनाट्य आणि नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे.
रणधुमाळी महापालिका निवडणुकांची : पुण्याची काँग्रेसची धूरा पृथ्वीराज चव्हाणांकडे?
या पार्श्वभूमीवर आधी नाराज शरद पवारांची काँग्रेस नेत्यांनी भेट घेऊन त्यांची समजूत घालून दिल्यानंतर, काँग्रेस नेते आणि मंत्री बाळासाहेब थोरात आणि मंत्री नितीन राऊत यांनी दिल्लीत जाऊन आधी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली होती. यांनतर आता राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि महिला बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींची भेट घेतली आहे. महाविकास आघाडीत असलेले मतभेद आणि काँग्रेसमध्ये सुरु असलेले नाराजीनाट्य, यासंदर्भात या भेटीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
“काँग्रेसनेही कायम केला आहे यंत्रणाचा यथेच्छ गैरवापर”, भाजपने आकडेवारी देत केला गंभीर आरोप
दरम्यान, काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील लखनौमध्ये, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांची भेट घेतली होती. यासोबतच या भेटीत विधानसभेचे रिक्त असलेले अध्यक्षपद या संदर्भातही चर्चा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच, राज्यमंत्रिमंडळात येत्या काळात बदल होणार असून, काँग्रेसच्या काही नेत्यांना यातून डच्चू मिळणार आहे, तर त्यांच्याजागी कोणाची वर्णी लावावी यांसंदर्भात देखील यात चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
Read Also :
- मुंबई विमानतळाचे मुख्यालय अहमदाबादला हलवलं; अदानींचा मोठा निर्णय
- भाजप-राष्ट्रवादीच्या दोन युवा नेत्यांमध्ये जुंपली, फडणवीसांवरच्या टीकेला दिले ‘गावरान तुपाने’ प्रत्युत्तर
- आरक्षण मिळवून न देण्यामागे ‘या’ नेत्यांचा हात, भाजपने उघड केली झारीतील शुक्राचार्यांची नावे
- मनसेने महापालिकेला घोषीत केले ‘कैलासवासी पुणे महानगरपालिका’ ; सत्ताधाऱ्यांच्या ढिसाळ कारभारावर निशाना
- धक्कादायक! मोदी सरकारचा देशाच्या सुरक्षेशी खेळ? विरोधकांनी केला हेरगिरीचा भांडाफोड