रत्नागिरी : राज्य सरकारचे एकापाठोपाठ एक मंत्री चौकश्यांच्या दुष्ट चक्रात अडकत असून, अनिल देशमुख यांच्यापाठोपाठ आता परिवहनमंत्री अनिल परब यांच्या देखील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
काही दिवसांपूर्वी भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मंत्री अनिल परब यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. तसेच, त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. दरम्यान, आता त्या तक्रारीची केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या विभागाने दखल घेतली असून, त्यांनी परब यांच्या रत्नागिरी येथील अलिशान रिसॉर्टची आज पाहणी केली आहे. महामारी काळात कोट्यवधी रुपये खर्च करून परब यांनी, समुद्रकिनारी बेकायदेशीर पॉपर्टी खरेदी करुन, हे ‘साई रिसॉर्ट’ बांधले आहे, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांची दिल्ली येथे मी भेट घेतली. मंत्री अनिल परब यांनी लॉक डाऊन दरम्यान रत्नागिरी येथील दापोली येथे ₹१० कोटीचा बेकायदेशीर साई रिसॉर्ट बांधला. त्याचा तपास करण्यासाठी दिल्लीहून विशेष टीम जाणार. ED, CBI, आयकर विभाग, महसूल कडे ही मी तक्रार केली आहे. pic.twitter.com/0lRONJTFmJ
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 13, 2021
तसेच, सोमय्यांनी याबाबतची तक्रार फक्त पर्यावरण मंत्रालयच नाही, तर ईडी, सीबीआय, आयकर विभाग आणि महसूल मंत्रालयाकडे देखील केली आहे. त्यामुळे आता केंद्रीय पथकाच्या अहवालानंतर परब यांच्या १० कोटींच्या आलिशान अशा ‘साई रिसॉर्ट’ वर कारवाई होणार का, त्याचं भवितव्य काय असेल हे ठरणार आहे. सोबतच आघाडी सरकारमध्ये मंत्री असलेल्या परब यांच्या अडचणी देखील वाढणार का? हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे.
understood tomorrow 12 June representative of environment ministry Govt of India will visit #AnilParab Sai Resort Dapoli
भारत सरकारचा पर्यावरण मंत्रालयाचे प्रतिनिधी उद्या अनील परब चा साई रिसॉर्ट दापोलीची पाहणी करणार, असे समजले आहे @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) June 11, 2021
दरम्यान, किरीय सोमय्या यांच्या या आरोपांनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी देखील पत्रकारांनी बोलताना, ‘सोमय्यांच्या आरोपांना आम्ही त्या-त्या प्लॅटफॉर्मवर उत्तर देऊ,’ असं उत्तर दिलं आहे.
Read Also :
- चंद्रकांतदादाना काय झालंय माहित नाही; मराठा आरक्षणप्रश्नी संभाजीराजेंची भूमिका योग्य
- ‘केंद्रात ‘राम’भरोसे, मात्र उत्तर प्रदेशात भाजपचं सरकार जाणार हे नक्की’
- मोदी सरकारमुळेच मुंबई तुंबली – राहुल शेवाळे
- पवार, चव्हाण आम्हाला महत्वाचे नाहीत; पंतप्रधानांशी काय चर्चा झाली नीट जाहीर करावं; मेटेचा मुख्यमंत्र्यांना सवाल
- वंचित आघाडी-संभाजीराजे मेतकूट जमल्यास, शिवशाहीला नाही ‘पेशवाई’ला फटका
- मंत्र्यांचे आजोबा-पणजोबाही वारीला जातात, सरकारने विचार करूनच निर्णय घेतलायं – भुजबळ