कोल्हापूर : खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी, मराठा आरक्षणाचा राज्य सरकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्यानंतर, मराठा समाजाच्या भावनांचे आणि रोषाचे नेतृत्व करत राज्यभर आरक्षणप्रश्नी मोहीम केली. तसेच, त्यांनी राज्यभरातल्या महत्वाच्या नेत्यांच्या गाठभेटी घेत, या प्रश्नावर चर्चा केली आणि यांनतर त्यांनी ठाकरे सरकार समोर ५ मागण्या ठेवत, त्यांची पूर्तता ६ जूनपर्यंत करण्याचे अल्टिमेटम दिले होते.
दरम्यान, त्यांच्या मागण्यांवर ६ जूनपर्यंत राज्य सरकारकडून कोणताही ठोस असा विचार केला गेला नाही. त्यामुळे, आता मराठा समाज १६ जूनला कोल्हापुरातून पहिला मोर्चा काढणार असून, हे आंदोलन मूक पद्धतीने करण्यात येणार आहे. तसेच, “आम्ही बोललोय आता लोकप्रतिनिधींनी बोलायला लागतंय” अशी या आंदोलनाची टॅगलाईन असेल. लोकप्रतिनिधींना बोलावंच लागेल. आपली भूमिका काय आहे, हे त्यांना सांगावचं लागेल,’ असं स्पष्ट मत संभाजीराजे यांनी, आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मांडले आहे.
तसेच, ‘सरकारकडून माझ्या मागण्यांवर विचारही झाला नाही आणि कुणी किंमतही दिली नाही. उपमुख्यमंत्र्यांनी फक्त फोन केला, तर मुख्यमंत्र्यांनी राहुल शेवाळे यांच्याकडून बोलण्याचा प्रयत्न केला,’ अशी खंत व्यक्त करत त्यांनी, ‘३६ जिल्ह्यातल्या आंदोलनाची देखील सरकारने दखल घेतली नाही तर करायचं काय, आम्ही बांगड्या भरल्या आहेत का? आता एकदाच जोर लावायचा आणि पुण्यापासून मंत्रालयापर्यंत लॉंग मार्च काढायचा. पण अशी वेळ आमच्यावर येऊ देऊ नका,’ असा इशाराही त्यांनी सरकारला दिला आहे.
यावेळी त्यांनी, या मुद्द्यावरून राजकीय खेळ सुरू झाल्यामुळेच मी आक्रमक भूमिका घेतली. न्यायालयाने आरक्षण रद्द केल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांत, कोण चुकलं याची जास्त चर्चा झाली. मात्र, त्यांनी चुका काढण्यापेक्षा मार्ग सांगितले पाहिजे होते. त्यामुळे, आता शाहूंच्या भूमीतून आंदोलन व्हावी अशी माझी भूमिका आहे. कोल्हापूरनंतर नाशिक, अमरावती, संभाजीनगर, रायगड अशा क्रमाने मोर्चे होतील. आम्ही आमचा आक्रमकपणा सोडणार नाही. सरकारने आमच्याशी खेळ करू नये,’ असा निर्वाणीचा इशारा देखील संभाजीराजेंनी दिला आहे.
Read Also :
- “आमची दोस्ती जंगलातल्या वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे” – चंद्रकांत पाटील
- ७ वर्षांत भाजपला मिळालेल्या यशाचं श्रेय ‘मोदींच्या चेहऱ्यालाच’ – संजय राऊत
- सत्ताधारी भाजपबद्दल पुणेकरांमध्ये असंतोष; २०२२ ला राष्ट्रवादीचा झेंडा फडकणार?
- आघाडी सरकार पाच वर्षे टिकणारच; शरद पवारांनी विरोधकावर साधला निशाणा
- “शिवसेना हा विश्वासू पक्ष”- शरद पवार