सिंधुदुर्ग – कोकणच्या सिंधुदुर्गमध्ये वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीची तयारी सुरू आहे. या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची बैठक झाली. बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक काका कुडाळकर यांनी महाविकासआघाडीमधील त्यांचे मित्रपक्ष शिवसेना आणि काँग्रेसला इशारा दिला की, राष्ट्रवादीच्या दृष्टीने सन्मानजनक जागावाटप झाले तरच युती होईल.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी ‘या’ दिग्ग्ज मंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुका लढविल्या जाव्यात, असा आमचा आग्रह आहे. संख्यात्मक नव्हे; तर गुणात्मक फॉर्म्युल्यानुसार जागावाटप व्हावे, अशी आमची भूमिका आहे. शिवसेनेकडून सन्मानजनक प्रस्ताव आला नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवेल, असे ते म्हणालेत.
कुडाळकर काँग्रेसबद्दल म्हणालेत की, काँग्रेसने स्वबळाची घोषणा केली आहे. पण, जिल्ह्याची स्थिती पाहून काँग्रेसच्या जिल्ह्यातील नेत्यांनी निर्णय घ्यावा. आम्हीदेखील स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. ठराविक जागाच आम्हाला मिळाल्या पाहिजेत, असा आमचा आग्रह असणार नाही. मात्र, ज्या पक्षाकडे निवडणूक जिंकण्याची क्षमता असलेला उमेदवार असेल त्यालाच उमेदवारी देण्यात यावी, अशी आमची भूमिका आहे.
मुंबईला ओरबाडून गुजरात आत्मनिर्भर करणार का? संजय राऊतांचा रोखठोक सवाल
संख्यात्मक नव्हे; तर गुणात्मक निकषांवर आघाडी व्हायला हवी. आम्ही अवाजवी मागणी करणार नाही. पाच वर्षांत सत्ताधारी पक्षाने विकासकामे केलेली नाहीत. नागरिकांना विकास हवा आहे. वैभववाडी शहरात नागरी सुविधा, घनकचरा व्यवस्थापन यांसह विविध विकासकामे होणे अपेक्षित होते; ती झालेली नाहीत. स्थानिक आमदार विकास करू शकलेले नाहीत, अशी टीका कुडाळकर यांनी केली.
Read Also :
- जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी; मात्र एकनाथ खडसे की रोहिणी खडसे?
- कारवाईचा बडगा: संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा कायदा लागू करणार; अनिल परबांचा इशारा
- चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब – नवाब मलिक
- चिंता वाढली: दक्षिण अफ्रिकेतून मुंबई विमानतळावर आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह
- चीनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी आत्ताच सावध व्हा; शिवसेनेचा केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला