मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नुकताच महाराष्ट्र दौरा केला. यामध्ये बऱ्याच राजकीय भेटीगाठी झाल्या. पहिले भेट ममतांनी शिवसेनेचे नेते आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि प्रवक्ते संजय राऊत यांची घेतली.
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
त्यानंतर ममतांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले होती कि युपीए आता आहेच कुठे?.परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला देखील ममता बॅनर्जी यांनी लगावला होता. ममतांनी असं वक्तव्य केलं ते महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेसच्या चांगलंच जिव्हारी लागलं. यानंतर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी एकामागून एक अशी नाराजी व्यक्त केली. यामध्ये अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नाना पटोले अशा सर्वच दिग्ग्ज मंत्र्यांनी ममतांच्या बोलण्याचा निषेध व्यक्त केला आणि त्यांना रोखठोक उत्तरही दिले.
साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
आता यानंतर मध्यतंरी पासून कमालीचे गाजलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी देखील याभेटीवर आपले मत व्यक्त केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ममतादीदींसोबत राहणार की काँग्रेससोबत राहणार, अशी चिंता काही जणांना वाटत आहे. परंतु जे स्वत:ला चाणक्य समजत होते, अशा चाणक्य समजणाऱ्यांना मात देणारे चाणक्य म्हणजे पवारसाहेब आहेत, असे विधान मलिक यांनी केले आहे.
ममता बॅनर्जींच्या मुंबई दौऱ्यांनंतर आता काँग्रेसच्या हालचालींना वेग..!
राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन विरुद्ध विचार असणारे पक्ष एकत्र येतील असे कधी कुणी स्वप्नातही पाहिले नव्हतं तशीच परिस्थिती आता या देशात होणार आहे, असा इशाराही मलिक यांनी दिला. विरोधकांना एकजूट करण्याचे काम स्वतः आमचे नेते शरद पवार करतील असेही मलिक म्हणाले. कोणत्याही मित्रपक्षाला बाहेर काढून देशात आघाडी होणार नाही. यासाठीसर्व मित्रपक्षांनी एकत्रितपणे येऊन भारतीय जनता पक्षाला विरोध करणे गरजेचे आहे असं देखील मलिक म्हणाले आहेत.
Read Also :
- चिंता वाढली: दक्षिण अफ्रिकेतून मुंबई विमानतळावर आलेले 9 प्रवासी पॉझिटिव्ह
- चीनची युद्धाची खुमखुमी जिरवण्यासाठी आत्ताच सावध व्हा; शिवसेनेचा केंद्र सरकारला सूचना वजा सल्ला
- मावळ तालुक्यात झालेले ‘ते’ दोन पक्षप्रवेश पडणार कोणाच्या पथ्यावर?
- पिंपरी-चिंचवडचे नेतृत्व करण्याची क्षमता असलेला नेता महेश लांडगे!
- परभणीत महापालिकेसाठी ‘रासप’ने कसली कंबर; आमदार गुट्टे यांना देशमुखांची साथ