मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी वकिल गुणरत्ने सदावर्ते यांच्या वाहनांची तोडफोड केली आहे. त्यानंतर गुणरत्ने सदावर्ते आक्रमक झाले असून मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, अशी मागणी त्यांनी केली आहे. याप्रकरणी मराठा क्रांती मोर्चाच्या तीन कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. याच पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आपली बाजू मांडली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
आज सकाळी गुणरत्ने सदावर्ते यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, याचे आम्ही समर्थन करत नाही. ज्या कार्यकर्त्यांनी तो हल्ला केला ते मराठा क्रांती मोर्चा मुंबईमधील नाहीत. जर ते तरूण मराठा तरूण असतील आणि त्यांनी भावनेच्या भरात केलेलं हे कृत्य असेल तर त्यांच्या भावनांचा आदर करत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. असं मराठा क्रांती मोर्चाचे मुंबई समन्वयक अमोल जाधवराव यांनी सांगितले आहे.
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
दरम्यान, गुणरत्ने सदावर्ते हे कायम मराठा समाजाविषयी गरळ ओकत आले आहेत. त्यांनी किमान आता तरी शांत राहावं. मराठा समाज आपल्या मागण्या या सरकारकडे मागत आहेत. तर सदावर्ते हे मराठा समाजाशी काहीही वाकडं नसताना कायम क्लेशवाचक वक्तव्य का करत आहेत? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…श्रेयवादाची लढाई सुरू..! “मोदीजी आपण फित कापून खुशाल श्रेय घ्यावे”, राष्ट्रवादीने मोदींना लगावला खोचक टोला
हेही वाचा…“मनोज जरांगे पाटलांना तात्काळ अटक करा, वाहनांची तोडफोड केल्यानंतर सदावर्तेंची मागणी”
हेही वाचा…“राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा”, विजय वडेट्टीवारांची सरकारकडे मागणी
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?