नाशिक : उत्तर अन् पश्चिम महाराष्ट्रासोबत छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याील रब्बी हंगामापुढे टंचाईचे संकट आहे. राज्यातील सरासरी ५३ लाख ९७ हजार हेक्टरपैकी ३ लाख १४ हजार हेक्टर म्हणजे ६ टक्के क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. यानंतर राज्यात आता दुष्काळ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे. परंतु यामध्ये ४२ एवजी ४० तालुक्यांचा समावेश करण्यात येणार आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“तर अजित पवारांना कारखान्यात घुसू देणार नाही,” बारामतीतच अजित पवारांना घातली बंदी, दिला इशारा
एकीकडे रब्बी हंगामावर संकट आहे .खरीप वाया गेला आहे तर दुसरीकडे सरकार राज्यात फक्त चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या तयारीत आहे. राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करावा ही मागणी करूनही सरकारचे डोळे उघडत नाही. प्रत्यक्ष पाहणी न करता फक्त निकष डोळ्यासमोर ठेवून दुष्काळ जाहीर करणे हे योग्य नाही. सरकारने कठोर न होता शेतकऱ्यांबाबत सहानुभूतीने वागावे आणि निकषांची मर्यादा शिथिल करून निर्णय घ्यावा अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य
दरम्यान, दुष्काळ जाहीर झाल्यानंतर शेतकऱ्यांना जमीन महसुलाट घट मिळते, त्याचबरोबर पीक कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीसाठी स्थगिती, कृषिपंपाच्या चालू वीज बिलात ३३.५ टक्के सुट अशा सवलती मिळतात. रब्बी हंगामाच्या पुर्वमशागतीची कामे राज्यात सुरू आहेत. पुणे कोल्हापुर, संभाजीनगर, आणि लातूर विभागात ज्वारी, हरभरा, मक्याची पेरणी सुरू आहे. तर नाशिक विभागात ज्वारी, हरभऱ्याची पेरणी झाली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे गटाची उद्या सत्व परिक्षा, नार्वेकर उद्या मोठा निर्णय घेणार ?
हेही वाचा…“तर मोदींच्या नगरच्या सभेत एकाच वेळी ५ हजार कार्यकर्ते उभं राहून जाब विचारणार”, कुणी दिला इशारा ?
हेही वाचा…मराठा आरक्षणासाठी राजकीय हालचाली वाढल्या, मुख्यमंत्र्यांसह फडणवीस दिल्लीला रवाना
हेही वाचा…नाशिकचा अमन परदेशी सुषमा अंधारेंच्या विरोधात मानहाणीचा दावा ठोकणार, अंधारेंचं ‘ते’ आरोप तथ्यहीन
हेही वाचा…मराठा समाज आक्रमक..! बारामतीत अजित पवारांच्या घरासमोर ‘या’ दिवशी अन्नत्याग उपोषण करणार