मुंबई : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाला ४० दिवस उलटूनही सरकारने यावर भूमिका घेतली नाही. त्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून अनेक गावांमध्ये राजकीय नेत्यांना येण्यास बंदी घातली आहे. यासंदर्भात काही गावांमध्ये गावबंदीचे पोस्टर देखील झळकले आहेत. यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांना देखील बारामतीत बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
अजित पवार बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मोळी पुजनाला येणार आहेत. मात्र त्याआधीच मराठा क्रांती मोर्चाने अजित पवारांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे. अजित पवारांना बोलावू नका. त्यांनी येऊ नये आशा आशायाचे पत्र माळेगाव पोलिसांना आणि कारखान्याला देण्यात आले आहे.
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
अजित पवार कार्यक्रमस्थळी आले तर त्यांना कारखान्यात जावू दिले जाणार नाही, असा इशारा देखील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे. दरम्यान, २८ ऑक्टोबरला अजित पवारांच्या हस्ते माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे मोळी पुजन होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मनोज जरांगे यांना बळ देण्यासाठी संभाजी राजेंचं कर्तव्य, विनंती केली लगेचच अन् लगेचच झाली मान्य
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…फडणवीसांसोबत काय चर्चा झाली? निलेश राणे नाराज का? तब्बल २ तास चर्चेनंतर रविंद्र चव्हाणांनी सांगितली सगळी हकीकत
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाणानंतर आणखी दोन भाजपच्या नेत्यांमध्ये वाद, पुन्हा जोरदार आरोप-प्रत्यारोप
हेही वाचा…निलेश राणेंची राजकारणातून निवृत्ती, ‘या’ बड्या नेत्याला कंटाळून घेतली निवृत्ती ?