मुंबई : उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काॅंग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्यदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांनी इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहे. नरेंद्र मोदी यांचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं आहे. पण उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. खरंत तर ती त्यांची पात्रता नाही. संपूर्ण देश मोदी यांचं कुटुंब आहे, पण माझं कुटुंब-माझी जबाबदारी म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना कळणार नाही. अशी खोचक टिका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती
काल दसऱ्याच्या निमित्ताने दादर येथील शिवतीर्थावर उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार घणाघात केला. खास करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टिका केली आहे. त्यावर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा…दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती
शिवतीर्थावर बोलताना हिंदू धर्म संपवण्याची भाषा करणाऱ्या उदयनिधी स्टॅलिनबाबत बोलतील असं वाटलं होतं पण ते मूग गिळून गप्प बसले. कंत्राटी पद्धतीने भरती सुरू केल्याबद्दल ते आज तरूणांची माफी मागतील, असं वाटलं पण त्यांना महाराष्ट्रातील तरूणांपेक्षा स्वत: च्या मुलाच्या भविष्याची जास्त चिंता वाटत आहे. अशी ही टिका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर काँग्रेस धार्जिणी भूमिका घेत पुन्हा एकदा हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली दिली. खरं तर हिंदुत्वाचा वारसा मिळूनही उद्धव ठाकरे यांना इंडी आघाडीचे गोडवे गावे लागत आहेत.@narendramodi’जींचं कर्तृत्व संपूर्ण देशानं मान्य केलं…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) October 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….