मुंबई : सध्याच्या घडीला राजकारणाचा एक विचित्र काळ सुरू आहे. मोडतोड करून पक्ष फोडले जात आहेत आणि लोकशाहीला नष्ट करण्याचे काम सुरू आहे. या काळात चांगले विचार लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष विजयादशमीच्या शुभमुर्हतावर घरो घरी राष्ट्रवादी अभियान सुरू केल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. या मोहिमेअंतर्गत १ कोटी घरांमध्ये पोहोचण्याचा मानस असल्याचंही जयंत पाटलांनी सांगितले आहे.
हेही वाचा…“शरद पवारांचा एक काळ होता त्यावेळी गांभीर्याने..,”संघर्ष यात्रेतून रोहित पवारांचा हल्लाबोल
या अभियानांतर्गत शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या व देशाच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्याच नेतृत्वात जवळपास एक कोटी घरांपर्यंत पोहोचवतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारांचा पगडा ज्या मतदारसंघात आहे, त्या मतदारसंघात हा उपक्रम पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राबवला जाईल. या अभियानामार्फत २० लाख नवीन सक्रीय कार्यकर्ते पक्षाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न राहील व या सर्व कार्यकर्त्यांना पुढे NCPApp मार्फत पक्षाशी जोडण्यात येणार आहे.
हेही वाचा…शिंदे गटाची जोरदार बॅनरबाजी, आझाद मैदानावर शिंदे काय बोलणार ?
या अभियानांतर्गत कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व शरद पवार यांचे विचार मानणाऱ्या कुटुंबाच्या घराबाहेर हे स्टिकर लावले जाईल. या अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका नव्या परिवर्तनासाठी पहिले पाऊल टाकत आहे. आदरणीय पवार साहेबांविषयी ममत्व असणारा व आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास असणारा पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता व पदाधिकारी हा उपक्रम आपल्या भागात प्रभावी पद्धतीने राबवेल, असा मला विश्वास आहे. असंही जयंत पाटलांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
हेही वाचा…यामुळेच माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणातून घेतला सन्यांस, तर्कवितर्कांना उधाणं
हेही वाचा…“तुमचा मतदारसंघ हा माझाच मानते,”पंकजा मुंडेंनी विधानसभा मतदारसंघ निवडला, ? सभेतूनच दिलं संकेत
हेही वाचा…“खडसे आडनावामूळे पक्षातून डावलण्याचा प्रयत्न केला जात असेल तर..,” भाजपच्या महिला खासदाराचा गंभीर आरोप
हेही वाचा…मराठा समाजाकडून शरद पवारांच्या गाड्यांचा अडवला ताफा, तरूणांची जोरदार घोषणाबाजी