मुंबई : रत्नागिरी-सिंधूदुर्ग लोकसभेचे माजी खासदार आणि भाजपचे नेते निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता राजकारणात मन रमनत नाही असं म्हणत निलेश राणे यांनी राजकारणातून बाहेर जात असल्याची घोषणा त्यांनी सोशल मीडियावरून केली आहे. यातच पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्यामुळे राजकारणातून निवृत्ती घेतल्याची चर्चा आहे. याच पार्श्वभूमीवर आता रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना झाले आहेत.
हेही वाचा…दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती
निलेश राणे यांनी मंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्तक्षेपामुळे राजीनामा दिला असल्याची चर्चा एका बाजूला सुरू झाली आहे. त्यामुळे लगेचच रविंद्र चव्हाण यांनी निलेश राणे यांची भेट घेतली आहे. यातच आता दोन्ही नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी एकाच गाडीतून रवाना झाले आहेत. दोघेही नेते सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. निलेश राणे हे रविंद्च चव्हाण यांच्यावर नाराज असल्याचंही सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
दरम्यान, आगामी निवडणुकीसाठी निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणुक लढविण्यास आग्रही होते. परंतु भाजपच्या ध्येय धोरणनुसार एकाच घरात एकापेक्षा जास्त पद देण्यात येत नसल्याने निलेश राणेंची अडचण होत होती. त्यामुळे त्यांनी हा मार्ग स्विकारला असल्याचं सांगण्यात येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती