मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, त्याचा आम्ही सन्मान करतो. पण आमच्या लेकराबाळांचा प्रश्न आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाशिवाय आता थांबणार नाही. असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षण न देण्याचं कारण काय ? हे शोधलंच पाहिजे असे म्हणत काही तरी शिजतयं ? असंही मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…“सत्ताधाऱ्यांना सत्ता हातात ठेवायची असेल तर..,”युवा संघर्ष यात्रेतून शरद पवारांनी सरकारला दिला इशारा
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांनी दिलेली मुदत काल संपली आहे. यातच काल दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे यांनी शिवरायांची शपथ घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. असं म्हटलं होतं. त्यावर त्यांचा आम्ही सन्मान करतो. प रंतु अडचण असल्याशिवाय, मुख्यमंत्र्यांची तळमळ पाहता काही तरी गडबड आहे. काही तरी आत शिजतंय? नाही तर त्यांनी शपथ घेतली नसती. असं मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय.
हेही वाचा…यामुळेच माजी खासदार निलेश राणेंनी राजकारणातून घेतला सन्यांस, तर्कवितर्कांना उधाणं
जे टिकणारच नाही ते आरक्षण ते उच्च न्यायालयात टिकणारच नाही. बाकीच्या लोकांना कशातून आरक्षण दिलं आहे. ? त्या निकषात मराठे बसत नाही का? मग काय अडचण आहे? कशाला वारंवार तुम्ही कारण का सांगता. माळी समाजाचा व्यवसाय काय. विदर्भातील कुणबी समाजाला व्यवसाय काय ? त्यांना आरक्षण दिलं, ते कसं दिलं? त्यांनी किती कागदपत्र दिली? त्यांना आरक्षण देण्यासाठी तुम्ही किती समित्या नेमल्या? असे सवाल देखील मनोर जरांगे पाटलांनी सरकारला केले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती
हेही वाचा…दसऱ्याच्या मुहर्तावर ‘शरद पवारां’ची मोठी घोषणा, आगामी निवडणुकांसाठी मोठी आखली रणनिती