मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी अचानकपणे राजकारणातून निवृत्ती घेतल्यानंतर राजकीय तर्कवितर्क केले जात आहे. निलेश राणे यांच्या नाराजीमागे पालकमंत्री रविंद्र चव्हाण असल्याची चर्चा दुसऱ्या बाजूला रंगली आहे. त्यामुळेच आज रविंद्र चव्हाण आणि निलेश राणे यांनी एकाच गाडीतून जात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. परंतु निलेश राणे यांच्या नाराजीमागे नेमकी कारणं काय ? याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.
हेही वाचा…‘या’ कारणांमुळे निलेश राणेंनी घेतली राजकारणातून निवृत्ती, नारायण राणेंनी समजूत काढली पण….
२००९ मध्ये निलेश राणे खासदार , त्यानंतर सलग दोन वेळा निलेश राणे यांनी शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर २०२४ साठी निलेश राणेंना आमदारकीचं तिकीट देण्याची भाजपात चर्चा होती. भाजपातून लोकसभेसाठी रविंद्र चव्हाण यांच्या नावाची चर्चा होती. यातच पालकमंत्रीपदी निवड झाल्यावर चव्हाणांचा स्थानिक राजकारणात हस्तक्षेप वाढत चालला असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा…मोठी बातमी…! माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री अन् माजी राज्यपाल असलेल्या काॅंग्रेसच्या ‘या’ नेत्यांनी घेतली राजकारणातून निवृत्ती
उदय सामंतांचे बंधू किरण सामंत यांनाही लोकसभेचे वेध लागल्याची चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसात रवींद्र चव्हण आणि वैभव नाईक याच्यातील जवळीक वाढली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी राजकारणातून निवृत्ती घेतल्याची चर्चा सुरू आहे.
दरम्यान, निलेश राणे हे नारायण राणे आणि फडणवीसांच्या राजकारणाला कंटाळले आहे. ते आमचे कधीही प्रतिस्पर्धी नव्हते. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…उद्धव ठाकरेंची मोदींवर केलेली टिका भाजपच्या जिव्हारी लागली, भाजपकडून ठाकरेंवर पलटवार
हेही वाचा…निलेश राणे अन् रविंद्र चव्हाण एकाच गाडीतून सागर बंगल्याकडे रवाना, फडणवीसांसोबत चर्चा करणार
हेही वाचा…काही तरी शिजतंय? मराठा आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना कोण अडवतंय? जरांगे पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?
हेही वाचा…भरसभेत भास्कर जाधवांनी मोदींची केली मिमिक्री, मोदींवर चढवला जोरदार हल्ला
हेही वाचा…“रेशनवर बिअर वाटली तर घरोघरी दारू पिणारे तयार होतील”