मुंबई : गेल्या काही दिवसात आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषावर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकणार नाही असे मत व्यक्त केले आहे.
आर्थिक निकषावर आरक्षण देण्यासाठी १०३ वी घटनादुरुस्ती करताना केलेली व्याख्या परिपूर्ण नाही. एखादा शेतकरी असेल, तर पाऊस चांगला होईल, त्यावर्षी त्याचे उत्पन्न चांगले आणि आर्थिक आरक्षणातील उत्पन्न मर्यादेपेक्षा अधिक असेल. त्याउलट दुष्काळी परिस्थितीत ते मर्यादेपेक्षा कमी अशी स्थिती असेल. आर्थिक मागासलेपणाची परिपूर्ण व सर्वसमावेशक व्याख्या करावी लागेल, निकष ठरवावे लागतील. ते केलेले नसल्याने हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही, असे मत आंबेडकर यांनी व्यक्त केले. लोकसत्ता या वृत्तपत्राच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याच्या कथित कटामध्ये मला गोवण्याचा प्रयत्न केला गेला होता, असा धक्कादायक दावा देखील प्रकाश आंबेडकरांनी केला आहे.
मला गोवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर मी संबंधितांना इशारा दिला की मला तुम्ही गोवून दाखवा तुम्हाला युद्ध काय आहे ते दाखवून देतो, असेही ते म्हणाले.
Read Also :
- हर्षवर्धन पाटलांनी घेतली पृथ्वीराज चव्हाणांची भेट, मराठा आरक्षणाबाबत केली महत्त्वाची मागणी
- ‘नुसती स्तुती करू नये, गडकरींसारखे कामही करावे’
- मंत्रिमंडळ बैठक: ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ 3 मोठे निर्णय
- बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधेवरून मनसे आक्रमक
- ‘मातोश्रीने आमच्यासाठी दरवाजे बंद केले, आम्ही ‘मातोश्री’वर जाणं बंद केलं नाही’