मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल मंत्रीमंडळाच्या बैठकीत नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका थेट पद्धतीने घेण्याचा निर्णय घेतला. याचबरोबर आधीच्या सरकारच्या निर्णयांना तात्काळ स्थगिती दिली आहे. यावरूनच माजी उपमुख्यमंत्री व राज्याचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हा राज्य शासनाचा निर्णय लोकशाहीला मारक आहे. सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. फडणवीस मंत्रीमंडळाच्या विस्ताराला का घाबरत आहेत. असा सवाल अजित पवार यांनी केला होता. यावर आता एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरेंना शिंदेंचा मोठा धक्का; औरंगाबादसह, उस्मानाबाद नामांतराला स्थगिती
लवकरच मंत्रीमंडळाचा शपथविधी करण्यात येणार आहे. याबाबत जे काही बोललं जातय त्या प्रश्नात काही तथ्य, वस्तुस्थिती नसून ती अशी दिशाभुल करणारी वक्तव्य करण्यात येत आहेत. तो त्यांचा प्रश्न आहे. आम्ही आमचं सरकार मजबुतीने चालवतोय. 166 पेक्षा जास्तीचे आमदार आमच्यासोबत आहेत. हे स्थिर आणि मजबूत सरकार आहे आणि म्हणुन आम्ही लोकहिताचे निर्णय घेत आहोत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
“ज्या आमदारांना एकनाथ शिंदेंचा फोन जाईल, तो मंत्री बनेल”; अब्दुल सत्तरांचं सुचक वक्तव्य
सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक झाले आहेत. सरकार बदल्यानंतर आम्ही काहीतरी करतोय हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे. आपत्ती व्यवस्थपनाला संचालक नाही. अनेक वेळा पूर, ढगफुटी अशी संकटे येतात, त्यावेळी, मदत सचिव महत्वाचा असतो. पण सध्या सचिव नाही. हे सरकार अपयशी आहे. 165 आमदारांचा पाठिंबा असताना मंत्रीमंडळाच विस्तार का करत नाहीत असा सवाल देखील अजित पवारांनी उपस्थित केला आहे.
“लबाड लांडगे ढोंग करतायत, दिलासा द्यायचं सोंग करतायत”
एका बाजूला राज्य सरकारने पाच आणि तीन रुपयांनी इंधनावरील कर कमी केला असला तरी सामान्य माणसाला त्याचा काही फायदा होणार नाही. केंद्र सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर सातत्याने वाढवत आहे. गॅस सिलिंडरचे दर वाढवत आहे. त्यामुळे सामान्य माणसांना महागाईची झळ बसत आहे. यापेक्षा पुर्वीचे दिवस बरे होते, असे म्हणण्याची वेळ नागरीकांवर आली आहे, असेही मा. अजितदादा पवार यावेळी म्हणाले. तसेच यावेळी मा. अजितदादांनी राज्यात होत असलेली अतिवृष्टी, थेट लोकांमधून सरपंच आणि नगराध्यक्षाची निवड करण्याचा निर्णय, ओबीसींचे राजकीय आरक्षण, मंत्रिमंडळाचा विस्तार यासह अनेक विषयांवर भाष्य केले.
Read also
- “सध्या दोन जणांचे मंत्रीमंडळ असून दोघेच महाराष्ट्राचे मालक”; अजित पवारांचा खोचक टोला
- “..लवकरच शिल्लक यात्रा काढा”; मनसेचा आदित्य ठाकरेंना टोला
- “उद्धव ठाकरेंनी घेतलेले चुकीचे निर्णय थांबवले जातील”; नामांतराच्या निर्णयावरून सत्तारांची प्रतिक्रिया
- “औरंगजेब सरकारचा नातेवाईक कधीपासून झाला? हे सरकार हिंदुत्वद्रोही, महाराष्ट्रद्रोही”
- उद्धव ठाकरेंचा ऑगस्टपासून महाराष्ट्रात झंझावत दौरा! बंडखोरांना जोरदार प्रत्युत्तर देणार