मुंबई : राज्यात अजूनही करोनाच्या तिसऱ्या लाटेचे सावट असल्याने, अनिश्चिततेचे वातावरण आहे. यातच आता सण-समारंभाचे दिवस सुरु झाले आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर तोंडावर आलेल्या दहीहंडी सणाच्या निमित्ताने, आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची, गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. यावेळी, मुख्यमंत्र्यांनी गोविंदा पथकाला महत्त्वाचे आवाहन केले आहे.
“… तर आमच्याच मंत्र्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे मागू ,” भाई जगतापांचा नितीन राऊतांना इशारा
“जनतेच्या आरोग्याला प्राधान्य देऊन, त्यांचे प्राण वाचविण्यासाठी आपण सण -वार, उत्सव काही काळासाठी बाजूला ठेऊ, मानवता दाखवू आणि कोरोनाला पहिले हद्दपार करू असा संदेश महाराष्ट्राने जगाला द्यावा,” असे सांगत दहीहंडीवर याही वर्षी निर्बंध असतील असे संकेत दिले आहेत. तसेच, दहीहंडीऐवजी सामाजिक आणि आरोग्यविषयक उपक्रम हाती घेण्याचे आवाहन त्यांनी गोविंदा पथकांना केले आहे.
‘या’ महिन्यात राज्यात येणार सर्वात धोकादायक तिसरी लाट, राजेश टोपे म्हणाले…
“दहीहंडी सण मोठ्या थाटात साजरा करण्यासाची परवानगी द्यावी, नाहीतर आंदोलन करु,” असा इशारा दहीहंडी मंडळांच्या प्रतिनिधींनी राज्य सरकारला दिला होता. विरोधी पक्ष भाजपनेही सण नियम पाळून साजरा करू देण्याची परवानगी देण्यास हरकत नाही, अशी भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींनी आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक केली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील देखील उपस्थित होते.
Read Also :
- “पारनेरच्या तहसीलदार मॅडमला एवढंच सांगतो…”, अण्णा हजारेंचा ज्योती देवरेंना सल्ला
- “१२ कोटी जनतेला विचारा उत्कृष्ट मुख्यमंत्री कोण?” बावनकुळेंचे ठाकरे सरकारला आव्हान
- देशमुखांवर अटकेची टांगती तलवार! ईडीकडून केली गेली पुन्हा मोठी कारवाई
- महाविकास आघाडी सरकार म्हणजे गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे – देवेंद्र फडणवीस
- “भुजबळ संपल्यात जमा; मुख्यमंत्र्यांना कायमचंच घरी बसवू,” नारायण राणेंचा हल्लाबोल