मुंबई : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आले आहेत. यावेळी ते उत्तर प्रदेशात गुंतवणुक वाढवण्यासाठी उद्योगपतींची चर्चा करणार आहेत. परंतु मध्यंतरी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मराठी तरूणांना रोजगार मिळावा म्हणून उत्तर प्रदेशमधील तरूणांना मारहाण केली होती. हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. त्यामुळे जर राज्यात आघाडी सरकार असतं तर राज ठाकरे शांत बसले नसते. त्यामुळे आता शिंदे -फडणवीस सरकार सत्तेत असताना राज ठाकरे गप्प का?असा सवाल रिपल्बिकन पार्टी ऑफ इंडीचा खरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी केला आहे. यातच आता राष्ट्रवादीने देखील भाजपवर निशाणा साधला आहे.
शरद पवारांना जाणता राजा म्हणायला काय अडचण? छगन भुजबळांचा सवाल
राज्यातले उद्योग इतर राज्यांनी पळवले ते थांबवता आले नाहीत. आता स्वत:च्या कामावर मतदान मिळेल यावरही विश्वास नाही का? योगीजींचा दौरा फक्त उद्योजकांच्या गाठीभेटीसाठी की मतदार आकर्षित करण्यासाठी? महाराष्ट्रातील वृत्तपत्रांना फ्रंट पेज भरून जाहिराती देण्यामागचा भाजपचा छुपा अजेंडा काय? असा सवाल राष्ट्रवादीने केला आहे.
“महाराष्ट्राच्या इतिहासात पळवापळवीला थारा देणारे एवढे कमजोर नेते कधीचं झाले नसतील”
योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी काल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेतली. त्यांच्यासोबत उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, व गोरखपुरचे खासदार रवि किशन देखील उपस्थित होते. राज्यपालांनी योगी आदित्यनाथ यांना छत्रपती शिवाजी महाराजांची मुर्ती भेट दिली.
“आता शाहू, फुले, आंबेडकर ऐवजी जहांगीर, औरंगजेब, बाबर… म्हणणार बहुतेक NCP वाले”
आज मुंबईत योगी आदित्यनाथ रोड शो करणार आहे. मुंबईच नव्हे तर देशातील नऊ शहरांमध्ये त्यांचे रोड शो होणार असून त्यात राज्यातील गुंतवणूक संधीबाबत ते चर्चा करणार आहेत. यामध्ये ते टाटा समुह, रिलायन्स इंडस्ट्रीज, अदानी समूह, पिरामल, महिंद्रा, गोदरेज, आदित्य बिर्ला समुह, बाॅंबे डाईंग, ब्रिटानिया, जेएसडब्ल्यू समुह, एशियन पेंटस्, हिताची, हिरानंदानी, कोका-कोला, मारूती सुझुकी, अशोका लेलॅंड्स, ओस्वाल इंडस्ट्रीजसह अनेक कंपन्यांचे उच्चपदस्थ अधिकारी आणि ज्येष्ठ उद्योगतींशी चर्चा करणार आहेत.
Read also
- “राहुल गांधींची प्रतिमा मलिन करण्यासाठी 1 हजार कोटी खर्च”, प्रियंका गांधी
- जितेंद्र आव्हाडांच्या पत्नीचा खळबळजनक दावा, बलात्काराचा आरोप करण्यासाठी महिलेचा शोध, फडणवीसांना टॅग
- “कधीच कुणावर वैयक्तीक कंबरेखाली वार करत केला नाही, जर मला..” जितेंद्र आव्हाडांच्या ट्विटने खळबळ
- मुंबई फिल्मसिटी युपीला जाणार असल्याच्या आरोपावर योगीचं उत्तर, म्हणाले, मुंबई ही..
- “‘टिल्लू’ च्या वर्मावर घाव बसलाय”; राष्ट्रवादीचा नितेश राणेंना खोचक टोला