मुंबई : १०० कोटी वसुली प्रकरणात आरोप असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सक्तवसुली संचालनालयाने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली असून, त्यांची तब्ब्ल ४ कोटी २० लाखांची मालमत्ता ईडीने तातडीने जप्त केली होती. मात्र आता ईडीने याबाबतीत जप्त केलेल्या मालमत्तेची किंमत, ही ४ कोटी २० लाख नसून, ३५० कोटी रुपये इतकी असल्याची नवी माहिती आता समोर आली आहे.
चर्चा फक्त फडणवीस-पवारांच्या भेटीगाठींची, राज्यात राजकीय भूकंप होणार असल्याच्या तर्कवितर्कांना उधाण
ईडीने देशमुखांना याआधी ३ वेळा चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण प्रकृतीचं कारण देऊन त्यांनी चौकशीला येण्याचे टाळले. तसेच, ईडीने या प्रकरणात देशमुखांच्या दोन सचिवांना अटक केली होती. त्यांच्या चौकशीतून बाहेर आलेल्या माहितीच्या आधारे ईडीने देशमुखांच्या नागपुरातील, वरळीतील आणि पनवेलमधील संपत्तीवर जप्तीची कारवाई केली होती. तसेच, ८ एकर ३० गुंठे जमीनही जप्त करण्यात आली होती. या सर्व मालमत्तेची किंमत ४ कोटी २० लाख असल्याचं म्हटलं होतं.
शिरुरचे आजी-माजी खासदार आमने-सामने; रस्ता उद्घाटनाचे श्रेय लाटण्यासाठी आक्रमक!
मात्र, आजच्या बाजार भावाप्रमाणे या सर्व मालमत्तेची किंमत तब्बल ३५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं जात असून, यात देशमुखांच्या जमिनीचा भाव सर्वात जास्त आहे. ही जमीन रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील धुमत गावात असून, ती उरण पोर्ट आणि पळस्पे फाटाच्या दरम्यान मोक्याच्या ठिकाणी आहे. तसेच, नवी मुंबई विमानतळापासून काही अंतरावर आहे. त्यामुळे, या जमिनीचा भाव प्रचंड असून, एका गुंठ्याचा भाव १ कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं बोललं जात आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे-भाजप युती? फडणवीसांचे सूचक विधान
अनिल देशमुखांचा मुलगा सलील देशमुख याची भागीदारी असलेल्या, ‘प्रीमियर पोर्ट लिंक प्रा. ली.’ या कंपनीने ही जमीन रोख रक्कम देऊन, २००४-२०१५ काळात विकत घेतली आहे. त्याकाळात या जमिनीचा व्यवहार २ कोटी ६७ लाख रुपयांना झाला होता. आता या ३५० गुंठे असलेल्या जमिनीच्या एका गुंठ्याची किंमत १ कोटी रुपये गुंठा असल्याने, एकूण जमिनीची किंमत सुमारे ३५० कोटी रुपये होत आहे.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला पुन्हा गर्दी; पक्षाची मोर्चेबांधणी सर्वसामान्यांच्या मुळावर उठलीये का?
दरम्यान,अनिल देशमुखांना ईडीने ३ वेळा समन्स बजावले, मात्र त्यांनी चौकशीला प्रकृतीच्या कारणामुळे जाणे टाळले. तसेच, मुलगा ऋषिकेश याला देखील एकदा समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, चौकशी टाळण्यासाठी दोघांनीही आता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यासोबतच ईडीने अनिल देशमुख यांच्या पत्नी आरती देशमुख यांनाही समन्स बजावलं होतं. त्यांनी देखील हजर न राहता आवश्यक ती कागदपत्रे ईडीला सादर केली आहेत.
Read Also :
- कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल, “हे’ आहे खरे कारण
- राज्यात ईडी विरोधी पक्षाशी सल्लामसलत करुन काम करतेय; जयंत पाटील म्हणतात…
- एमएच १२ चे बडे नेते राष्ट्रवादीत; २०२२ ला महापालिका निवडणुकीत घड्याळ भाजपचे १२ वाजवणार?
- मोदींच्या सभेत काळे मास्क खेचून काढले, कलियुग म्हणतात ते हेच का?
- काँग्रेसच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीची विदर्भात दुय्यम भूमिका, मात्र आता हे खपवून घेणार नाही