सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा झालेल्या पराभवामुळे राजकारण चांगलंच रंगात आलं आहे. पराभवासाठी शिंदेंनी नाव न घेता शिवेंद्रराजेंना जबाबदार धरत आपल्याला निवडणूकीत पाडण्यामागे मोठं कारस्थान झाल्याचं सांगितलं. शिवेंद्रराजेंनीही शशिकांत शिंदेंना शालजोडीतले लगावत आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे.
पहाटेच्या शपथविधीला दोन वर्षे, चंद्रकांत पाटलांना त्याचेच झटके येत असतील – संजय राऊत
दुसऱ्यावर पराभवाचं खापर फोडणं सोपं असतं, पण पराभव का झाला याचं आत्मचिंतन करणं गरजेचं आहे. पंचवीस मतदारांनी तुम्हाला का डावललं? यामध्ये स्वतःचा काहीच दोष नाही का? तुमच्या काहीही चुका झाल्या नाहीत का…शशिकांत शिंदेंनी याचा अभ्यास करुन आत्मचिंतन करावं. तुम्ही अॅक्शनला रिअॅक्शन येणारचं असं म्हणत शिवेंद्रराजेंनी शिंदेंना टोला लगावला आहे.
“महाराष्ट्र केंद्रशासित करा आणि केंद्राला चालवायला द्या”; प्रीतम मुंडे कडाडल्या
पराभव झाला की दुसऱ्यावर खापर फोडायचं आणि निवडून आलो की स्वतःच्या हिमतीवर निवडून आलो असं दाखवायचं. यात षडयंत्र वगैरे काही नाही. मी स्वतः भाजपमध्ये असूनही सहकार पॅनलसोबत राहिलो आणि पॅनलमधील सर्वांना जास्तीत जास्त मत कशी मिळतील हे पाहिलं. कोणाला जावळीत लक्ष घालायचं असेल तर खुशाल घालावं. मी इथला आमदार आहे, माझे असंख्य कार्यकर्ते आहे, मला फरक पडत नाही असं म्हणत शिवेंद्रराजेंनी शिंदेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
Read Also :
- साताऱ्याच्या निकालाने राष्ट्रवादीत फुटीची चिन्हे; शशिकांत शिंदेंचे थेट संकेत
- एसटी संप आज मिटणार का? ११ वाजता राज्य सरकार आणि आंदोलकांमध्ये होणार महत्वाची बैठक
- निलेश लंके लावणार अवघ्या 1 रुपयात 101 शाही विवाह; पवार कुटुंबीय करणार कन्यादान
- साताऱ्यातील राष्ट्रवादी कार्यालयावर दगडफेक प्रकरणावर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
- एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा? शरद पवारांच्या परबांना महत्वाच्या सूचना