औरंगाबाद : राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार राजकारणातील चाणक्य मानले जातात. त्यांनी कित्येक वर्ष राजकारणात यशस्वीरित्या घालवली आहे. याच दरम्यान त्यांना कॅन्सरचं निदान देखील झालं होतं. मात्र त्यांनी कॅन्सरवर मात करत आपल्यातील प्रबळ इच्छाशक्ती त्यांनी साऱ्या जगाला दाखवून दिली. याचा किस्सा त्यांनी मराठवाडा कॅन्सर रूग्णालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांंगितला.
काॅंग्रेसचे 5 आमदार भाजपच्या संपर्कात; काॅंग्रेसलाही बसणार मोठा धक्का
“२००४ साली मला कॅन्सरचं निदान झालं होतं. यावेळी एक डॉक्टर माझ्यावर उपचार करत होता. तेव्हा मी त्याला विचारलं, माझ्याकडे पाहून तुला काय वाटतं, मला काय झालं असेल? त्यावेळी तो म्हणाला, खरं सांगू का…, मोठे डॉक्टर तुम्हाला खरं सांगत नाहीत. पण मी तुम्हाला सांगतो. तुमची काही कामं राहिली असतील, तर ती करून घ्या. त्यावर मी त्याला विचारलं, नेमकं काय म्हणायचंय, मला समजलं नाही. त्यावर डॉक्टर म्हणाले, तुमच्याकडे सहा महिन्याचं आयुष्य उरलं आहे.” “त्यावर मी त्याला सांगितलं, पैज लाव… मी काही इतक्या लवकर जात नाही. असंही ते म्हणाले.
‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा समावेश; बालहक्क आयोगाचं पत्र, ठाकरेंवर कारवाई होणार?
पुढे हसत त्याला सांगितलं, अगदीच जर तू म्हणत असशील तर तुला पोहोचवल्यावरच मी जाईन, त्यामुळे तू माझ्याबद्दल असा काही उल्लेख करू नको. तेव्हा २००४ साल होतं आज २०२२ आहे, मी अजून जिवंत आहे. मी अजून जाग्यावर आहे.” असंही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्यामागे शरद पवारांचा मोठा हात होता. तसेच राज्यातील राजकारणात त्यांचा वाटा मोठा आहे.
Read also
- “माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही, परंतु मला तुमची ताकद हवीय”
- “प्रशासनाला विनाकारण ताण येईल, असं काहीही करू नका”; राज ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन
- महाराष्ट्र, मध्यप्रदेश आता गुजरात अन् गोवामध्ये देखील ओबीसीचे राजकीय आरक्षण धोक्यात
- “आगामी निवडणुकांसाठी राष्ट्रावादीचा मोठा निर्णय”; निवडणुकीत २७ टक्के ओबीसी आरक्षण देणार
- “पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”