मुंबई : राज्यात 18 ऑगस्ट रोजी राज्यात 92 नगर परिषदा आणि 4 नगर पंचायतींच्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यावरून सध्या राज्यात राजकीय वातावरण चांगलाचं चिघळलं आहे. तर एकनाथ शिंदे या ओबीसी आरक्षणाच्या मुद्दयावरून अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यावर आता या निवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे.
“सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात न्यायालयीन निर्णयाच्या प्रतीक्षेत आपण सर्वच जण आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सनदशीर मार्गाने सर्व प्रयत्न केले आहेत व यापुढेही करत राहू. ओबीसी समाजाला न्याय मिळणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्वाचे असल्याने येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एकूण उमेदवारांपैकी २७ टक्के उमेदवार ओबीसी समाजाचे देण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतला आहे. असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
“अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”
राज्यात नगरपालिका, नगर परिषदेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. ओबीसी आरक्षणाशिवाय या निवडणुका जाहीर झाल्याचा आम्हाला धक्का बसला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांना सांगितले. जर या निवडणुका ओबीसी आरक्षणासहीत होत नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात सर्व ठिकाणी २७ टक्के जागांवर ओबीसी समाजातील नेत्यांना उमेदवारी देईल, असा निर्धार जयंत पाटील यांनी व्यक्त केला. बांठीया समितीने त्यांचे काम पूर्ण करून दिल्यानंतर आता होणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणासहीत होण्याची गरज आहे, अशी पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी सांगितले.
“फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
दरम्यान, राज्यातील ९२ नगर परिषदांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुक आयोगाने जाहीर केल्या असल्या तरी माझ्या मतदार संघातील परळी नगर परिषद निवडणुकीत ओबीसी उमेदवारांना २७ टक्के जागा देण्याचा निर्णय घेतला आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण परत बहाल केले जावे, ही आमची भूमिका आहे व राहिलं असं ट्विट राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी देखील केलं आहे.
Read also
- “पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”
- “पवारांना माहिती नव्हतं तर ठाकरेंनी मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावले होते का?”
- काॅंग्रेसचे 5 आमदार भाजपच्या संपर्कात; काॅंग्रेसलाही बसणार मोठा धक्का
- ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा समावेश; बालहक्क आयोगाचं पत्र, ठाकरेंवर कारवाई होणार?
- “आम्हाला विचारून कोणताही निर्णय घेऊ नका”; सेनेची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव