मुंबई : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेवटच्या कॅबिनेट बैठकीत औरंगाबादचं नाव संभाजीनगर तर उस्मानाबादचं नाव धाराशीव करण्याचा निर्णय घेण्यात आला. नामांतरच्या मुद्याबाबत काहीच माहिती नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली आहे. आता यावर औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे.
“फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
शरद पवार यांनी औरंगाबादेत डॅमेज कंट्रोल करण्यासाठी आले आहेत. शरद पवार यांना माहिती नव्हतं तर मग कॅबिनेटमध्ये उद्धव ठाकरे मंत्र्यांना गाणी ऐकायला बोलावत होते का? जयंत पाटील का बैठकीतून बाहेर पडले नाहीत? असा प्रश्नही इम्तियाज जलील यांनी केला आहे. औरंगाबाद आणि संभाजीनगरच्या मुद्याला हिंदु आणि मुस्लिम या नजरेतून बघू नका, शरद पवार यांना हे स्पष्टीकरण द्यायला वेळ का लागला? असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे.
शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
शहराचे नाव बदलण्यासाठी शासकीय पातळीवर 1 हजार कोटी रूपये खर्च येतो. सगळे नाव बदलणं, आधार कार्ड,पॅन कार्ड, पासपोर्ट, दुकानाची नावं,सर्टिफिकेट हे सगळं बदलावं लागणार, याचा खर्च कोण करणार? असा सवालही जलील यांनी केला आहे. तर त्यांना काॅंग्रेसवर देखील निशाणा साधला आहे. अशोक चव्हाण यांनी सांगितलं की औरंगजेबाने संभाजी महाराजांची क्रुर हत्या केली. मग माझा प्रश्न आहे की अशोक चव्हाण कधी भाजपमध्ये सामील होणार आहेत. असा सवालही केला आहे.
खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’
दरम्यान, नामांतरणरच्या मुद्दाबाबत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबाद आणि धाराशीव या शहराचं नाव बदलण्यापुर्वी आम्हाला कोणतीही कल्पना नव्हती. असं शरद पवार यांनी म्हटलं होतं.
Read also
- काॅंग्रेसचे 5 आमदार भाजपच्या संपर्कात; काॅंग्रेसलाही बसणार मोठा धक्का
- ‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांचा समावेश; बालहक्क आयोगाचं पत्र, ठाकरेंवर कारवाई होणार?
- “आम्हाला विचारून कोणताही निर्णय घेऊ नका”; सेनेची केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव
- “सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
- “अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”