मुंबई : शिवसेनेच्या 16 आमदारांच्या निंबलनाच्या कारवाईवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीसाठी अजून बराच वेळ लागेल आणि तोपर्यंत 16 बंडखोर आमदारांवर कारवाई होणार नसल्याचा म्हणत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे शिंदे गटाला मोठा दिलासा मिळाला आहे. जेष्ठ वकिल कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात मांडला होता. याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने केंद्रीय निवडणुक आयोगाकडे धाव घेतली आहे.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
महाराष्ट्रबाबतच्या याचिकेवर आजच सुनावणी व्हावी असं कबिल सिब्बल यांनी म्हटलं होतं. मात्र या कारवाईवर खंडपीठ नेमण्यासाठी बराच वेळ लागणार असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय लांबणीवर टाकला आहे. तर जो पर्यंत हा निकाल लागत नाही तोपर्यंत अध्यक्षांना 16 आमदार निलंबन करण्याचा कोणताही अधिकार नाही, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
“मुख्यमंत्री म्हणाले तुच जिल्हा प्रमुख”, सेनेतून काढल्यानंतर संतोष बांगर यांनी ठाकरेंना ललकारले
त्याचबरोबर शिवसेनेचे पक्ष चिन्ह असलेलं धनुष्यबाणावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थितीत झालं आहे. त्यामुळे शिवसेनेने यासंदर्भात आता केंद्रीय निवडणुक आयोगाला पत्र पाठवलं आहे. आमची बाजू ऐकल्याशिवायच धनुष्यबाणाबाबत निर्यण घ्या. असं शिवसेनेने पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. गेल्या काही दिवसापासून शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात धनुष्यबाण आणि शिवसेनेवरून राजकीय वाद सुरू आहे.
पंकजा मुडेंना मंत्रीपद मिळण्यासाठी मुंडे समर्थकांकडून वैद्यनाथाला साकडे
दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रतेचा विषय असो की नवीन सरकार स्थापनेचा आणि राज्यपालांच्या अधिकारांचा. सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ या सर्व प्रकरणांची सुनावणी करणार आहे आणि तोपर्यंत आमदारांच्या निलंबनाचा निर्णय घेता येणार नाही. कपिल सिब्बल यांनी महाराष्ट्राचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात नेला आणि म्हणाले की, उद्या विधानसभेत अपात्रतेच्या प्रकरणावर सुनावणी होईल. त्यामुळे SC आमच्या याचिकेवर सुनावणी घेत नाही तोपर्यंत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्यापासून रोखावे. सर्वोच्च न्यायालयावर आमचा विश्वास आहे. सर्वोच्च न्यायालय कुणाच्याही खिशात नाही त्यामुळे आमच्यासोबत न्याय होईल, हा विश्वास आम्हाला आहे. आदित्य ठाकरे यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळतोय. राज्यातील सरकार बेकायदेशीर आहे. असं मत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडले होते.
Read also
- “सेनेचे 12 खासदार शिंदे गटात लवकरच सामील होणार”; भाजपच्या आमदाराचं सुचक वक्तव्य
- “अडीच हजारांची दाढी अन् अडीच हजार रूपयांची कटिंग करणारं असंवेदनशील शिंदे सरकार”
- “फिर कानो में शोर आएगा, तुम्हारा तो सिर्फ वक्त है.. हमारा दौर आएगा”
- शिंदे गटातील आमदार गोगावलेंच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात; 7 गाड्या एकमेकांवर आदळल्या
- खंजीर, कोथळा, बंधन, शपथा, प्रतिज्ञापत्रानंतर पक्षप्रमुखांचं शिल्लक आमदारांना ‘प्रेमपत्र’