मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून कोरोना रुग्णसंख्येचा खाली येणार आलेख आता पुन्हा वर जाऊ लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसतेय. तर दुसरीकडे कोरोनाच्या डेल्टा विषाणूसह, ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्याही वाढता दिसत आहे. काही दिवसांपूर्वी राज्यातील मंत्रिमंडाळातील काही मंत्र्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती.
…तर महाराष्ट्रात लॉकडाऊन लावालाच लागेल; मंत्री विजय वडेट्टीवार यांचा गंभीर इशारा
राज्यातील १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. “जर यापुढेही राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत राहीली तर राज्य सरकार आणखी कठोर निर्बंध घालू शकते,” असे संकेतही पवार यांनी दिले.
पक्षातील विरोधकांना धडा शिकवणार; नाना पटोलेंचा काँग्रेस नेत्यांना थेट इशारा
“अधिवेशनाच्या कालावधीत केवळ पाच दिवसांमध्ये १० मंत्री आणि २० आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. कालच राज्य सरकारनं कोरोनाची नवी नियमावली जाहीर केलीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी नियमांचं भान ठेवलं पाहिजे,” असंही ते म्हणाले.
“प्रत्येकाला कार्यक्रम मोठ्या प्रमाणात साजरे व्हावं असं वाटतंय. पण नव्यानं आलेला कोरोनाचा व्हेरिअंट वेगानं पसरत आहे. अमेरिका फ्रान्स, इंग्लंड येथे दररोज लाखो रुग्ण सापडत आहे. आपण दुसऱ्या लाटेची मोठी किंमतही मोजली आहे. प्रत्येकाचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी सरकारही प्रयत्न करतंय. आताच नियम कडक का असा आग्रह करु नये, सर्वांनी सहकार्य करावं,” असंही पवार म्हणाले.
Read also:
- “गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके
- बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता