दिल्ली : एकीकडे देशात महामारीने जीवित आणि वित्त हानी झाली आहे. तसेच या हाताबाहेर गेलेल्या परिस्थितीला नियंत्रणात आणण्यासाठी अनेक राज्यांनी लॉकडाऊनचा पर्याय अवलंबला आहे. आरोग्य सुविधांवाचून रुग्णांचा श्वास टांगणीला लागलेला आहे, मात्र असे असतानाही आपल्याच महत्वाकांक्षा पूर्ण करत असल्याची टीका सातत्याने विरोधकांकडून होत आहे.
यावरून, देशातल्या एकूण १२ पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना एकत्रितपणे पत्र लिहिलं असून, “आम्ही स्वतंत्र पक्ष म्हणून अनेकदा आणि संयुक्तपणे देखील, देशातल्या सध्याच्या परिस्थितीकडे आपलं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुर्दैवाने आपल्या सरकारने आमच्या सर्व शिफारशी नाकारल्या किंवा त्यांच्याकडे सोयीस्कररीत्या दुर्लक्ष केलं. परिणामी देशातल्या महामारीच्या परिस्थितीने गंभीर रूप धारण केलं आहे”, असं या पत्रामध्ये लिहिण्यात आलं आहे. तसेच, या पत्रात एकंदरीत ९ मुद्द्यांबाबत भाष्य करण्यात आलं आहे.
दरम्यान, या पत्रावर काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाचे नेते एच.डी.देवेगौडा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, सपचे अखिलेश यादव, राजदचे तेजस्वी यादव, भाकपचे डी. राजा, माकपचे सीताराम येचुरी तसेच, मुख्यमंत्र्यांमध्ये उद्धव ठाकरे (शिवसेना), ममता बॅनर्जी (तृणमूल काँग्रेस), एम.के.स्टॅलिन (द्रमुक) आणि हेमंत सोरेन (झारखंड मुक्ती मोर्चा) या नेत्यांचा समावेश आहे.
पत्रातले काही मुद्दे…
- सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प तातडीने स्थगित करून, तो पैसा महामारीसाठी वापरण्यात यावा.
- देशभरातल्या सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण
- कृषी कायदे रद्द करावेत
- गरजू लोकांना तातडीने मोफत अन्नधान्य
- बेरोजगारांना दरमहा सहा हजार रुपयांचा भत्ता
Read Also :
- ठाकरे सरकारने दिली कोर्टाला हमी, परमबीर सिंग यांना तूर्तास अटक नाही
- करोना लसींसाठी जागतिक निविदा मागवणारी आमची पहिली महानगरपालिका – किशोरी पेडणेकर
- उद्धव ठाकरे मुंबईचेच मुख्यमंत्री का?; उपदेशाचे डोस देणारे शरद पवार कुठे आहेत!
- सामान्य माणसाच्या विरोधात लढण्यासाठी, आघाडी सरकार देतंय वकीलाला अडीच लाख रुपये!
- सामान्य माणसा “तूच तुझा सांगाती”, वसुली सरकारवर विसावला त्याचा कार्यभाग बुडाला