मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांना पुढच्या सुनावणीपर्यंत तरी आम्ही अटक केली जाणार नाही, अशी हमी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे. त्यामुळे सिंग यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला, तरी परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सिंग यांनी त्यांच्यावर पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुन्हा रद्द व्हावा, तसेच या प्रकरणात सीबीआयकडून चौकशी करण्यात यावी, यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात लिहिलेलं पत्र मागे घ्यावं, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं देखील नमूद केलं आहे.
दुसरीकडे परमबीर सिंग यांच्यावर अकोल्यातील पोलिस अधिकारी भीमराव घाडगे यांच्या तक्रारीनुसार, अॅट्रोसिटी प्रिव्हेन्शन अॅक्टद्वारे गुन्हा दाखल करण्यात आला गुन्हा दाखल करण्यात आला असून, हा गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालायत याचिका दाखल केली आहे.
पोलिस निरीक्षक घाडगे यांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपानंतर, अनुप डांगेच्या तक्रारीतही परमबीर सिंग यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत, तर व्यावसायिक (बुकी) सोनू जलाननेही त्याच्या तक्रारीत, परमबीर सिंग यांच्याकडून जबरदस्तीने पैसे घेण्यात आल्यचा आरोप केला आहे.
Read Also :
- करोना लसींसाठी जागतिक निविदा मागवणारी आमची पहिली महानगरपालिका – किशोरी पेडणेकर
- सामान्य माणसाच्या विरोधात लढण्यासाठी, आघाडी सरकार देतंय वकीलाला अडीच लाख रुपये!
- सामान्य माणसा “तूच तुझा सांगाती”, वसुली सरकारवर विसावला त्याचा कार्यभाग बुडाला
- अखेर लॉकडाऊनमध्ये वाढ, जारी केली नवी मार्गदर्शक तत्वे
- उद्धव ठाकरे मुंबईचेच मुख्यमंत्री का?; उपदेशाचे डोस देणारे शरद पवार कुठे आहेत!