मुंबई : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रणनिती आखण्यात सुरूवात केली आहे. या निवडणुकांसाठी आता बैठकांचं सत्र देखील सुरू असून ठाकरे गट मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघापैकी ४ मतदारसंघासाठी आग्रही असून दोन मतदारसंघ काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीला सोडणार असल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा…“तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्या,” ‘त्या’ घटनेवरून विजय वडेट्टीवारांची शिंदेंकडे मागणी
मुंबईतील दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि ईशान्य मुंबई या चार लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट आग्रही आहे. यामध्ये दक्षिण मुंबईसाठी विद्यमान खासदार अरविंद सावंत आणि उत्तर पश्चिम लोकसभेच्या जागेसाठी अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटाकडून हिरवा कंदील देण्यात आला आहे. ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटातील राहुल शेवाळे खासदार आहेत. तर दक्षिण मध्य मुंबईची जागा भाजपकडे आहे. आता या दोन्ही मतदारसंघासाठी उमेदवारांची चाचपणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम
दरम्यान, मुंबईतील लोकसभेच्या सहापैकी चार जागांवर ठाकरे गटाने दावा सांगितला असून महाविकास आघाडीची ४-१-१ असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. यातच उत्तर मध्य मुंबई आणि उत्तर मुंबी या दोन जागा राष्ट्रवादी आणि काॅंग्रेससाठी ठाकरे गटाने सोडली आहे. मातोश्रीवर झालेल्या बैठकीत ठाकरे गटातील नेत्यांनी या मतदारसंघाबाबत चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“सरकारकडे पक्ष फोडायला, सरकार फोडायला पैसे आहेत, पण औषधं घ्यायला पैसे नाहीत”, सुळेंचा हल्लाबोल
हेही वाचा…रोहित पाटलांच्या उपोषणाला राष्ट्रवादीची साथ, जयंत पाटलांनीही केली फडणवीसांकडे मागणी
हेही वाचा…गोपीनाथ मुंडेंचे मावळे धावले पंकजा मुंडेंच्या मदतीला, तब्बल ‘इतक्या’ लाखांची केली मदत
हेही वाचा…“शासकीय रुग्णालय मृ’त्यू’चा सापळा, सरकारमधले तीन पक्ष ठणठणीत, बाकी महाराष्ट्र आजारी”
हेही वाचा…घाटी रूग्णालयात मृ’त्यू’चं थैमान..! खासदार हेमंत पाटलांनी रूग्णालयाच्या डीनलाच लावलं टॉयलेट साफ करायला