नांदेड : नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. औषधांचा तुटवडा असल्याने रूग्णांना आपला जीव गमावावा लागला असल्याचं बोललं जात आहे. याच रूग्णालयात सगळीकडे दुर्गंधी असून स्वच्छता देखील नसल्याचं समोर आलं आहे. यातच खासदार हेमंत पाटील यांनी नांदेड रूग्णालयाचे अधिष्ठात्यालाच टॉयलेट साफ करायला लावलं आहे. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
कालपासून आणखी ७ रूग्णांचा नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दूर्दैवी मृत्यू झाला आहे. अत्यावश्याक औषधांच्या साठा उपलब्ध न झाल्याने आतापर्यंत ३१ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. काल २४ आज ७ मृत्यू झाले असून ज्यामध्ये १६ निष्पाप बालकांचा समावेश आहे. औषधांचा तुटवडा असल्याचा आरोप रूग्णांच्या नातेवाईकांनी केला आहे. मात्र शासकीय रूग्णालयाचे डीन संजय राठोड यांनी औषधांचा तुटवडा नसल्याची माहिती दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात रूग्णालयाकडून नातेवाईकांना मोठ्या प्रमाणावर बाहेरून औषध आणण्यासाठी सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?
दरम्यान, रूग्णालयात जे १० मृत्यू झाले आहेत ते बाहेरील रूग्णालयातून आमच्याकडे रेफर केले होते. आमच्याकडे ४० हार्ट पेशंट होते, त्यातले आम्ही ३८ वाचवले १० रूग्ण दगावले. किडनीचे २७ रूग्ण आहेत. त्यातला १ रूग्ण दगावला अन् २६ वाचवले. आमच्याकडे औषधांचा तुटवडा नाही, आम्हाला लोकल मधून औषधे खरेदी करण्याची परवानगी आहे, आणि काही सामाजिक संस्था आम्हाला मदत करतात, असं संजय राठोड यांनी म्हटलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तानाजी सावंत अन् हसन मुश्रीफांचा राजीनामा घ्या,” ‘त्या’ घटनेवरून विजय वडेट्टीवारांची शिंदेंकडे मागणी
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम
हेही वाचा…रोहित पवार काढणार ८२० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा, कधी, कुठे आणि कोण कोण असणार? वाचा सविस्तर
हेही वाचा…शिंदेंची ताकद वाढली, आतापर्यंत ठाकरेंचे ३५ नगरसेवक फोडले, काॅंग्रेसच्या महिला नेत्यालाही लावलं गळाला
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा”, आव्हाडांनी कुणाला केलं आवाहन ?