नांदेड : कालपासून आणखी ७ रूग्णांचा नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दूर्दैवी मृत्यू झाला आहे. अत्यावश्याक औषधांच्या साठा उपलब्ध न झाल्याने आतापर्यंत २४ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. काल २४ आज ७ मृत्यू झाले असून ज्यामध्ये १६ निष्पाप बालकांचा समावेश आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…ठाकरेंच्या शिलेदाराकडून फडणवीसांचा ‘फडतूस’ उल्लेख, भाजपकडून जोरदार प्रहार होणार ?
मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे” ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान घातलं आहे. किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारला केला आहे.
हेही वाचा…“संजय राऊत आदित्य ठाकरेंना चावले, तेव्हाच राऊतांसारखी त्यांची वक्तव्ये”, शिंदे गटाने डिवचलं
दरम्यान, आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देताय, आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर निघताय. इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय ? मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे “हत्यारे सरकार” आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल. असा घणाघात देखील वडेट्टीवारांनी चढवला.
READ ALSO :
हेही वाचा…102 फॅरनहेट ताप, उपोषणाला बसलेल्या रोहित पाटलांची तब्येत बिघडली,उपोषणावर ठाम
हेही वाचा…रोहित पवार काढणार ८२० किलोमीटरची युवा संघर्ष यात्रा, कधी, कुठे आणि कोण कोण असणार? वाचा सविस्तर
हेही वाचा…शिंदेंची ताकद वाढली, आतापर्यंत ठाकरेंचे ३५ नगरसेवक फोडले, काॅंग्रेसच्या महिला नेत्यालाही लावलं गळाला
हेही वाचा…“महाराष्ट्राच्या विश्वासाला तडा जाऊ देऊ नका, सगळ्यांनी पुन्हा मिळून एक व्हा”, आव्हाडांनी कुणाला केलं आवाहन ?
हेही वाचा…“घाटी रुग्णालयात मृ’त्यू’चा थैमान..! किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?