नाशिक : गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाशिक महागरपालिकेत एक मोठा आर्थिक घोटाळा असल्याचा बाँम्ब फोडला आहे. मागील आठ वर्षांपासून ‘एलआयसी’ योजनेअंतर्गत असलेली घरे अजूनही हस्तांतरित करण्यात आलेली नाही. यात सातशे ते आठशे कोटींचे नुकसान झाले असल्याचा दावा गृहनिर्माण राज्यमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरच्या माध्यमातून केला आहे.
गोव्यात मनोहर पर्रीकर यांचे काम पूर्णत्वाला नेण्याचं काम भाजप करत आहे – देवेंद्र फडणवीस
नोव्हेंबर २०१३ च्या नियमानुसार विकास नियंत्रण नियमावली, तसेच डिसेंबर २०२०पासून लागु करण्यात आलेल्या एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटासाठी गृह सदनिका मिळण्यासाठी शासनाकडून एक नियम गठीत करण्यात आलेला आहे .
गोव्यातील भाजपची पहिली यादी जाहीर; प्रमोद सावंत साखळीतून, डिसोझा म्हापशातून लढणार
या नियमानुसार वीस टक्के प्लॉट किंवा सदनिका बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळाल्यानंतर महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाकडे (म्हाडा) हस्तांतरीत करावे लागतात. मात्र नाशिक महानगरपालिकेने या निर्णयाला फाटा दिला आहे. नाशिक महापालिकेने अद्यापही दहा घरे न देऊन विकासकांना बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिला आहे. हा एक प्रकारे गुन्हा असून, यातून ७०० ते ८०० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
मोठी बातमी: सोमवारपासून पुन्हा शाळा सुरू होणार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
मुंबई, ठाणे, पुणे या सारख्या स्मार्ट सिटी असणाऱ्या शहरांमध्ये म्हाडाने मोठ्या प्रमाणात लॉटरी काढली असताना नाशिकमध्ये म्हाडाकडे घरे हस्तांतरीत झाली नसल्याने संशय वाढला आहे. यामधून साडेतीनहजार घरे ही हस्तांतरित न होता परस्पर विक्री झाल्याचा संशय बळावला आहे. २०१३ ते २०२१पर्यंत म्हाडाने नाशिक महापालिकेकडे २२ वेळा पत्रव्यवहार केला. परंतू, एकाही पत्राला उत्तर न मिळाल्याने नोव्हेंबर २०२१ मध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली. त्यानंतरही माहिती देण्यात टाळाटाळ झाल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
Read also:
- हत्तीच्या पिल्लाला चंपा अन् माकडाला चिवा नाव; शिवसेना – भाजपात जुंपली
- हे ‘नथु’राम… खासदार अमोल कोल्हे यांचे “चिंतन”; सर्वकाही दिल्लीतील तख्तासाठी!
- राणीच्या बागेत ‘पेंग्विन’ टोळीचा 106 कोटींचा घोटाळा; भाजप आमदार मिहीर कोटेचा यांचा आरोप
- कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा झेंडा हसन मुश्रीफांच्या हाती; उपाध्यक्षपदी कोण?
- उत्पल पर्रिकरांना भाजपकडून तिकीट देत होतो, पण…; देवेंद्र फडणवीसांच स्पष्टीकरण