मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनास आजपासून सुरुवात झाली आहे. सभागृहात प्रवेश करण्यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या इतर मंत्र्यांसह विधानभवन परिसरातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री मंत्र्यांनी सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलं आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मुंडे यांनी शेतकऱ्यांसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाची शरद पवारांसोबत ४५ मिनिटं चर्चा, बैठकीत काय झालं ? अजित पवार गटांनी दिली माहिती
राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे, मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे.
हेही वाचा…राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकवटले…! शरद पवारांच्या भेटीला, मोठा राजकीय भुकंप होणार ?
चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी आज मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाचे कामकाज संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
ज्याप्रमाणे बीटी-कापूस बियाण्यांच्या बाबतीत बोगस बियाणे वितरित करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल होतो, त्याच धर्तीवर तोच कायदा अन्य बियाण्यांच्या, खतांच्या व कीटक नाशकांच्या बाबतीतही लागू करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आल्याचे पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार विरूद्ध शरद पवार, व्हीप कुणाचा मानायचा? राष्ट्रवादीच्या आमदारांना प्रश्न
हेही वाचा…“..तर दादांच्या गटाला दारातूनच गेटलॉस्ट केलं असतं”, संजय राऊतांनी अजित पवारांना डिवचलं
हेही वाचा…उपसभापतींना अपात्र करा, विरोधकांच्या मागणीनंतर आता निलम गोऱ्हे म्हणाल्या की, “मी चर्चेला वेळ…”,
हेही वाचा…“शरद पवारांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, अन्…”, शरद पवारांच्या भेटीनंतर पटेलांनी दिली मोठी प्रतिक्रिया
हेही वाचा…डझनभर विरोधी पक्षातील नेते राजभवनावर पोहचले, राज्यपालांकडे केली ‘ही’ मागणी