यवतमाळ : यवतमाळ लोकसभा मतदारसंघात खासदार भावना गवळी आणि विद्यमान मंत्री संजय राठोड यांच्यातला वाद बराच वर्षापासून सुरू आहे. एकाच पक्षात राहून दोन्ही नेत्यांचे पटत नसल्याचे दिसून येत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा असून या दौऱ्याच्या निमित्ताने दोघांमध्ये होर्डिंग वार दिसून आला आहे. नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर एकमेकांचे फोटो नसल्याचे दिसून येत आहे. भावना गवळी यांनी लावलेल्या बॅनरवर संजय राठोड यांचे फोटो नाहीत तर संजय राठोड यांच्या बॅनरवर भावना गवळी यांचा फोटो नसल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा…“फसव्या घोषणा अन् पोकळ आश्वासनांची रेलचेल, अर्थसंकल्प म्हणजे शिळ्या कडीला उत आणणारा “
मोदींच्या हस्ते आज यवतमाळ जिल्ह्यात विविध विकासकामांचे उद्घाटन होणार आहे. त्याची महायुती सरकारकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. परंतु स्वागतासाठी लागलेल्या बॅनरवरून संजय राठोड आणि भावना गवळी यांच्यातला वाद ठळकपणे दिसून आला आहे. राज्य सरकारच्या प्रोटोकॉलनुसार पालकमंत्र्याचा फोटो अपेक्षित आहे. परंतु भावना गवळी यांच्या बॅनरवर राठोड यांचा फोटो लावण्यात आलेला नाही. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार म्हणून भावना गवळी यांचाही फोटो अपेक्षित असतांना राठोड यांनी तो टाळल्याचे दिसून येत आहे.
हेही वाचा..जनतेला वेड्यात काढण्याचा महायुतीचं कामं, आधी आंतरवाली सराटीच्या लाठीचार्जची SIT चौकशी करा, मग..
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातून संजय राठोड निवडणुक लढण्यासाठी इच्छूक असलेचे दिसून येत आहे. त्यांनी तसा दावा देखील ठोकला आहे. तर दुसऱ्या बाजूला मेरी झांशी मै नहीं दुंगी असं म्हणत भावना गवळी यांनी पुन्हा निवडणुक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. यातच आता पुढच्या निवडणुकीत कुणाला ? उमेदवारी दिली जाणार आणि जो कोणी उमेदवार असणार त्यासाठी काम केलं जाणार का ? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मोदींच्या एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी १२ कोटी रूपयांचा चुराडा, विरोधकांची सरकारवर जोरदार टिका
हेही वाचा..“ओबीसी आणि मुस्लिम एकत्र झाले तर आपण 48 पैकी 48 जागा जिंकु”, कुणी केला ‘हा’ मोठा दावा ? राज्यात तिसरी आघाडी ?
हेही वाचा…वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक, शिरूरची जागा राष्ट्रवादीच लढणार, महायुतीचा उमेदवार कोण ?
हेही वाचा…“मनोज जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का ?” उद्धव ठाकरेंचा सरकारला खोचक सवाल
हेही वाचा…“अंतरवाली सराटीच्या दंगलीत टोपेंच्या कारखान्यातून दगडं आणलीत,” भाजपचा आरोप, राजेश टोपेंची प्रतिक्रिया म्हणाले…