मुंबई : महाराष्ट्राच्या विधीमंडळात सत्ताधाऱ्यांकडून एक काळा अध्याय लिहिला गेलाय. महाराष्ट्रात आणीबाणी लावण्याचा प्रयत्न केला जातोयं. आम्ही शांततेन आंदोलन करत असताना ज्या प्रकारे पत्रकारांना तेथून हाकलण्याचं काम करण्यात आलं, कॅमेरे ओढले, लोकशाहीची हत्या सुरु आहे. या सरकारचा बुरखा फाटतोय. यांचा भ्रष्टाचार बाहेर येतोय. त्यामुळे महाराष्ट्र यांच्याविरोधात आहे, अशी संतप्त प्रतिक्रीया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
मोठी बातमी: भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई; पत्रकारांनाही हाकालले, कॅमेरे हिसकावून घेतले
भाजपच्या प्रतिविधानसभेवरुन सत्ताधारी सभागृहात आक्रमक झाले आहेत. त्यामुळे अध्यंक्षांनी भाजपच्या प्रतिविधानसभेवर कारवाई करण्यात आली आहे. भाजपकडून प्रतिविधानसभेतील माईक, स्पीकर ताब्यात घेण्यात आले. शिवाय पत्रकार, प्रतिनिधिंना देखिल हाकालण्यात आले आहे. मार्शल पाठवून कारवाई करण्यात आली असल्याचे भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आरोक केला जात आहे.
भाजपाने भरवली प्रतिविधानसभा; फडणवीसांनी मांडला धिक्कार प्रस्ताव
आमदारांवर खोटे आरोप लावून निलंबित केलं, पत्रकारांवरही दंडुकेशाही सुरु आहे. आम्ही प्रेसरुममध्ये आमचं अधिवेशन करु, लोकशाहीच्या स्तंभांना जर कुलूप लावण्याचं काम ठाकरे करणार असेल तर आपल्याला जागरुक व्हावं लागेल, असेही कारवाईनंतर बोलतांना फडणवीसांनी सांगितले.
नागपुरात १२ आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन, महाविकास आघाडी सरकारचा पुतळ्याची जाळपोळ
भाजपाने भरवलेल्या प्रतिविधानसभेविरोधात भास्कर जाधव यांनी सभागृहात आवाज उठवला. प्रतिविधानसभा घेण्यास परवानगी दिली आहे का?, तिथे कागद वाटले जात आहेत. स्पीकर लावण्यास परवानगी दिलीये का? आदी मुद्दे त्यांनी उपस्थित केले. भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यानंतर मलिक यांनी पाठिंबा देत काही विषय मांडले. अधिकार नसताना माजी आमदार यात कसे सहभागी होत आहे. काल झालेल्या गदारोळावेळी आम्ही मार्शलला बोलवलं, पण कुणीही आलं नाही. या सभागृहाच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकाऱ्याला जाब विचारावा, अशी मागणी मलिक यांनी विधानसभा अध्यक्षांकडे केली. त्याचप्रमाणे भास्कर जाधव यांना संरक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली. त्यावर अध्यक्षांनी कारवाई करण्याचे निर्देश दिले. स्पीकर वापरण्यासंदर्भात परवानगी दिलेली नाही. तसेच बाहेर जे बोललं जात आहे, तेही तपासून घेतलं जाईल, असं अध्यक्षांनी सांगितलं. तसंच प्रतिविधानसभेत वाटल्या जाणारे कागद वाटणाऱ्यांवर कारवाईचे आदेशही अध्यक्षांनी दिले.
Read Also :
- ‘त्या’ १२ आमदारांना सर्वोच्च न्यायालयात जायचे असेल जाऊ द्या, निलंबन रद्द होणार नाही”
- त्यांना परवानगी दिली कोणी; भास्कर जाधवांचा भाजपच्या प्रतिविधानसभेवर सवाल
- अब्दुल सत्तारांनी माझी जमीन हडपलीय, सिल्लोडच्या महिलेचा आरोप, मंत्रालयासमोर आंदोलन
- भाजपच्या नेत्यांचे विधीमंडळाच्या पायऱ्यांवर ठिय्या; सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी
- देगलूर-बिलोली विधानसभा मतदारसंघासाठी भारतीय जनता पक्षाची जय्य्त तयारी; नेत्यांचे दौरे वाढले