औरंगाबाद : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर उद्या जाहीर सभा होत आहेत. त्यासाठी राज ठाकरे पुण्यातून सकाळीच औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. मात्र यावेळी 30 ते 40 गाड्यांचा ताफा औरंगाबादकडे जात असताना मध्येच गाड्यांचा अपघात झाला. त्यात अपघातात सात ते आठ गाड्या एकमेकांवर आदळल्याने गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
“मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे मोठी सभा होत आहे. त्यासाठी गाड्याचा ताफा जात असताना 7 ते 8 गाड्या एकमेकांवर आदळल्या. त्यात दिग्दर्शक केदार शिंदे आणि अभिनेते अंकुश चौधरी यांच्या गाडीचंही नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र यात कोणतेही दुखापत झाल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी पुण्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर राज ठाकरे हे औरंगाबाद कडे निघाले.
विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
औरंगाबादपासून अवघ्या 20 किलोमीटरच्या अंतरावर पुढील गाडीने अचानक ब्रेक मारला. त्यानंतर मागील गाड्या या वेगाने असल्याने पुढच्या गाड्यावर येऊन धडकल्या. यात गाड्याचं नुकसान झालं आहे. अंकुश चौधरी आणि दिग्दर्शक केदार शिंदे यांची मर्सिडीज गाडीचं नुकसान झालं आहे.
“…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
दरम्यान, राज ठाकरे यांचं औरंगाबाद याठिकाणी आगमन झालं आहे. त्यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी गर्दी करत राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे. त्यामुळे 1 मे रोजी राज ठाकरे सभेत नेमकं काय बोलणार ते आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
Read also:
- “हिरवा शालू नेसलेली राष्ट्रवादी अन् काॅंग्रेस सुर्यादय होण्याअगोदर लगेच त्यांच्या अंगावर भगवा शालू आला”
- “आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा”; धनंजय मुंडेंचं विरोधकांना आव्हान
- “ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
- “ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
- “दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन