सोलापुर : राज्यात मशिदीवरील भोंग्यांचं राजकारण हनुमान चालिसावर येऊन गेलं आहे. त्यावरून सध्या अनेक राजकीय नेते एकमेकांवर टिकाटिप्पणी करताना दिसत आहेत. याच दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याबरोबर मनसे अध्यक्ष राज ठाकरे चर्चेत आलेय. याचाच धागा पकडत राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी त्यावरून टोलेबाजी केली आहे.
“…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
धनंजय मुंडे म्हणाले की, नवनिर्माण आणि नवनीत राणा सध्या हनुमान चालिसा वाचत आहेत. हनुमान चालिसा मातोश्रीसमोर नाही तर मारूतीसमोर वाचायची असते. ती कुठंही तुम्ही वाचू लागलात तर हे संकटमोचन कधी तुमच्या मागे लागेल कळणार नाही. त्यामुळे हनुमान चालिसाचे राजकारण करू नका, असंही ते म्हणाले.
“राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
ज्यांच्या विचारात रक्तात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांच्यावर तुम्ही भाषणात महाराजांचा उल्लेख नाही, म्हणून आरोप करता. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिल्यांदा शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली त्यानंतर शरद पवार केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली असा उल्लेख करता राज ठाकरे यांच्यावर त्यांनी अप्रत्यक्ष टोला लगावला. त्याआधी राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टिका केली होती.
“राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
दरम्यान, आमच्यापेक्षा जास्त वेळ घेऊन हनुमान चालिसा वाचून दाखवा, असा इशारा देखील त्यांनी दिला. तसेच कोविड काळात दोन वर्ष गेले. केंद्र आणि राज्याची तिजोरी खाली झाली. पंरतु 50 हजार नियमित भरतो ते देण्यासाठी अडचण येऊ दिली नाही. शेतकऱ्यांना निधीची कमी भासू दिली नाही. देशात विकासाचा, नोकरीचा मुद्दा नसतो. त्यावेळी देशात जाती धर्मात तेढ निर्माण केली जात आहे. असंही ते म्हणालेत.
Read also:
- “ज्यांनी म्हटलं होतं सरकार पडेल, त्यांना आता काय वाटतं, ते मला माहिती नाही”
- “ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
- “दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
- विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?