मुंबई : बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांना केला होता. त्यावर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यावर टिका करताना त्यांची अवस्था गजनी सारखी झाली असल्याचं म्हणत जोरदार टोला लगावला. औरंगाबाद येथील सभेसाठी संदीप देशपांडे दाखल झाले आहेत. त्यावेळी पत्रकारांशी सवांद साधताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका केली आहे.
“राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
मला वाटतं त्यांचं मेमरी कार्ड डिलीट झालं आहे. तर उद्धव ठाकरे यांची अवस्था आमिर खानचा चित्रपटातील गजनी सारखी झाली आहे. कारण, ज्यावेळी बाबरी पडली त्यावेळी उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये व्यस्त होते. परंतु त्याचवेळी राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत फिरून शिवसेना वाढवण्याचं काम करत होते. परंतु कदाचीत उद्धव ठाकरे यांना हे आठवत नसावं असंही ते म्हणाले.
“त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”
2 एप्रिल रोजी झालेल्या सभेनंतर राज ठाकरे यांना ज्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. तेव्हापासून सरकारच्या पायखालची वाळू सरकली आहे. तर हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव ठाकरे आम्हाला नोटीस कशासाठी देत आहे. तर हनुमान चालिसा म्हणाल तर याद राखा, त्यामुळे हे कसले हिंदुत्ववादी नेते आहेत. यातूनच यांची मानसिकता कळते. ज्यावेळी तुम्ही हनुमान चालिसाला विरोध करत आहात. त्यावेळी तुम्हाला हिंदू मधला ह म्हणालयचा हक्क नाही, अशी शेलक्या शब्दात देखील त्यांनी टीका केली.
तुका म्हणे अवघें सोंग! तेथें कैंचा पांडुरंग; योगींचं कौतुक अन् काॅंग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा
दरम्यान, राज ठाकरे यांना खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या इफ्तार पार्टीबाबत त्यांनी समाचार घेतला. ज्यावेळी स्वत: इम्तियाज जलील मशिदीवरील भोंगे खाली उतरवतील त्यावेळी मी स्वत: त्यांच्या घरी जाऊन श्रीखंड़ खाऊ घालणार. त्यामुळे आता औरंगाबाद येथील सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
Read also:
- विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
- “…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा
- “राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
- “राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
- “राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण