मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत आणि विरोधी पक्ष असा काहीसा राजकीय संघर्ष मागील वर्षापासून सुरू आहे. शिवसेनेकडून संजय राऊत सडेतोड भूमिका मांडत आहेत. तर विरोधी पक्षांकडून तितकाच संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा राऊतांनी विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
तुका म्हणे अवघें सोंग! तेथें कैंचा पांडुरंग; योगींचं कौतुक अन् काॅंग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा
महाराष्ट्रातील वातावरण काही राजकीय पक्ष हे जाती, धर्माच्या नावावर खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे योग्य नाही. शिवसेनेच्या बदनामीचा आणि खास करून महाराष्ट्राच्या बदनामीचा एक व्यापक कट काही असामाजिक संघटना, तत्व या ठिकाणी एकत्र येऊन सुरू केलेला आहे. अनेक माध्यमातून त्यांना महाराष्ट्रात अस्थिरता निर्माण करायची आहे. सरकारसमोर अडचणी निर्माण करायच्या आहेत. या सगळ्याला उत्तर देणं गरजेचं आहे. असं पक्ष प्रमुखांनी म्हटलं आहे. असंही ते म्हणालेत.
“भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडल्या, युतीसंदर्भात चर्चा नाही” ; देवेंद्र फडणवीस
राज्यात जशास तसे उत्तर देणं हा शिवसेनेचा धर्म आणि स्वभाव आहे. त्याचं बाळकडू आमच्याकडे पाहिल्यापासून आहे. काल शिवसेना पक्ष प्रमुखांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी वर्षा या निवासस्थानी सर्वांची बैठक घेतली आहे. खासदारांची वेगळी बैठक घेतली. प्रवक्तांची वेगळी बैठक घेतली आणि त्यांनी काही नक्कीच सुचना दिलेल्या आहेत. त्या सुचनांचं पालन नक्कीच योग्य पद्धतीने होईल, असंही ते म्हणाले.
दरम्यान, आतापर्यंत आम्हाला सत्ता किंवा सरकार असल्यामुळे काही बाबतीत संयम आम्ही बाळगला किंवा ते बाळगणं संयुक्तीक असतं. परंतु जर पाणी डोक्यावरून जाणार असेल. तर त्या पाण्यात आम्हाला इतरांना बुडवावं लागेल. मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
Read also:
- “राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
- “राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
- “राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
- “राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करताहेत”; मनसे-भाजप युतीबाबत भुजबळांची प्रतिक्रिया
- “त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”