मुंबई : मनसे-भाजप युती संदर्भातील चर्चा सध्या राज्यभरात सुरू आहेत. यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना शक्य तरी आता युती होणार नाही. मात्र ज्या पद्धतीने मनसे सध्या भूमिका घेत आहेत. त्या भूमिका ह्या पहिल्यापासून भाजप घेत असल्याचं वक्त्यव त्यांनी केलं आहे. आता याच पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनसेला टोला लगावला आहे.
“भाजप मनसेच्या युतीसंदर्भात संघ कधीही पुढाकार घेणार नाही”; भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांचा दावा
राज्यात सुरू असलेल्या राजकीय खेळात अनेकजण उंच उड्या मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यातच आता भाजप आणि मनसेची युती होण्याच्या बातम्या वेग धरू लागल्या आहेत. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, भाजप-मनसे युती झाली तरी यामुले राज्यातील राजकारणात काहीही फरक पडणार नाही. कोण कशासाठी आपल्या भूमिका बदलतात. कशा बदलतात. या साऱ्याची कल्पना राज्यातील लोकांना आहे. असा टोला देखील त्यांनी मनसे आणि भाजपला लगावला. याशिवाय आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संपुर्ण चित्र स्पष्ट होईल असंही ते म्हणाले.
राज्यात बार्टी, सारथी आणि आता महाज्योती या संस्थांच्या माध्यमातून शासनाचे फायेद समाजातील विविध घटकांना मिळतात. महाज्योतीमध्ये कोण आणि सारथीमध्ये कोण याचा विचार केला तर कुणबी समाजाचा समावेश हा ओबीसीमध्ये होतो. त्यामुळे महाज्योतीच्या माध्यमातून कुणबी समाजाला जी मदत मिळेल, ती त्यांनी घ्यायला हवी. पंरतु कुणबी समाज दोन संस्थांमध्ये समाविष्ट असल्याने त्यांना एकच लाभ सारथी आणि महाज्योती दोन्ही संस्थांमधून घेता येणार नाही, असंही ते म्हणाले.
“पुरी ताकद से बताएं, पेट्रोल के दाम कम हुए के नहीं हुए ! इंधन दरवाढीबाबत राष्ट्रवादीचं अनोखे आंदोलन
दरम्यान, मनसे भाजपच्या युती संदर्भात अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. परंतु भाजपकडून युती होण्याचे कोणतेही स्पष्ट संकेत दिले नाहीत. भाजप-मनसेच्या युतीबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सकारात्मक असल्याच्या चर्चेबाबत प्रश्न विचारला असता मा. जयंत पाटील म्हणाले की, संघ ही अराजकीय संघटना आहे. त्यांचा राजकारणाशी संबंध नाही. अशा चर्चांमध्ये संघाचे नाव आणून भाजपची मंडळी संघालाच बदनाम करत आहेत. मनसेबरोबर भाजपने युती केल्यास मुंबईतील उत्तर भारतीय लोक लांब जातील, याची माहिती भाजपला आहे. त्यामुळे भाजप-मनसे युतीची चर्चा संघाकडून सुरु झाली असल्याचे चित्र मुद्दामहून निर्माण केले जात आहे.
Read also:
- “त्यांचे बंधू मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत महाराष्ट्राचं कौतुक करायचं नाही, असे बहुतेक त्यांनी ठरवलंय”
- तुका म्हणे अवघें सोंग! तेथें कैंचा पांडुरंग; योगींचं कौतुक अन् काॅंग्रेसचा राज ठाकरेंवर निशाणा
- “भाजप-मनसे युतीच्या बातम्या काही लोकांनी सोडल्या, युतीसंदर्भात चर्चा नाही” ; देवेंद्र फडणवीस
- “मग शिवसेनेचे वैचारिक मतपरिवर्तन हा तर नोबेल पारितोषिकाचा विषय”; चित्रा वाघ यांचा राऊतांना टोला
- “भाजप-मनसे युती झाली की नाही, तेच समजत नाही”; अजित पवारांची युतीसंदर्भात मिश्किल टिप्पणी