मुंबई : राज्यात महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याचे अनेक वक्तव्य गेल्या मागील वर्षापासून विरोधी पक्षाकडून केली जात आहेत. मात्र अजूनही राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. याचाच धागा पकडत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपला टोला लगावला.
“राष्ट्रवादी ही चाळीस चोरांची टोळी, त्यांच्या गुहेत दोन चोरांचे साथीदार”; खोतांचा पुन्हा एकदा टोला
औरंगाबाद येथील राज ठाकरे यांच्या सभेबाबत अजित पवार यांनी आज पत्रकारांशी सवांद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, कुणी काय सभा घ्यावी, कशी घ्यावी, त्याला परवानगी त्या त्या भागातल्या पोलिसांकडून दिली जात असते. आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान भारत एकसंघ ठेवण्यासाठी दिलं आहे. त्यामुळेच आपण गेली 75 वर्ष देशाला पुढे न्यायचा प्रयत्न करतोय. असंही ते म्हणाले.
“राज ठाकरे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन, त्यांच्या ज्वालांमध्ये कोण कोण भस्स होणार?
पुढे बोलताना ते म्हणाले की, परंतु काहीजण कधीकधी त्यातून नवीन प्रश्न निर्माण करतात. त्यात कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत येण्यासारखी परिस्थिती निर्माण होते. ती तशी होऊ नये, यासाठी महाविकास आघाडीचं सरकार सतर्क आहे. असंही अजित पवार म्हणाले. राज्यात ज्यांच्याकडे बहुमताचा आकडा असेल, ती व्यक्ती मुख्यमंत्री होऊ शकते. हे लोकशाहीतलं सत्य आहे. हे सरकार आल्यापासून कुणी म्हटलं 3 महिन्यात जाईल, 6 महिन्यात जाईल, 12 महिन्यात, एक वर्षात पंरतु आघाडील आता अडीच वर्ष झाले. आता त्यांना जर काही माहिती असेल तर मला त्याबद्दल काही माहिती नाही. असा टोला देखील त्यांनी लगावला.
“राज ठाकरे यांनी सभेपुर्वी इफ्तार पार्टीला यावं”; इम्तियाज जलील यांचं राज ठाकरेंना आमंत्रण
दरम्यान, सोनिया गांधी, शरद पवार, आणि उद्धव ठाकरे यांचा जोपर्यंत महाविकास आघाडीला पाठिंबा आहे. तोपर्यंत महाविकास आघाडी सरकार सत्तेत असणार, असंही ते म्हणाले. त्यामुळे मागील काही दिवसापासून सरकार पडणार करणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी चांगलाचं चिमटा काढला.
Read also:
- “ये रिश्ता क्या कहता है..! भाभीजी युसुफ लकडावाला से क्या ले रही है”
- “दंगली पसरू देऊ नका, शांतता व सलोखा राखा”; राज ठाकरेंच्या सभेपुर्वी वंचितचा कार्यकर्त्यांना आवाहन
- “मुख्यमंत्र्यांची अवस्था सध्या गजनीसारखी”; उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनसेकडून प्रत्युत्तर
- विरोधकांचा समाचार, तर हिंदुत्वाचा ज्वलंत मुद्दा, राज ठाकरे औरंगाबादच्या सभेत काय बोलणार?
- “…मग त्यांना गटांगळ्या खाव्या लागतील”; संजय राऊतांचा विरोधकांना सुचक इशारा