मुंबई : महामारीमुळे बेजार झालेल्या हॉटेल-बारचालक आणि आदरातिथ्य क्षेत्रातील व्यावसायिकांना, त्यांच्या क्षेत्रातील समस्यांचे निराकरण करून देण्याच्या उद्देशाने, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असून, यावरून भाजपने शरद पवार आणि महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे.
दरम्यान, भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी देखील थेट यावरून शरद पवारांवर टीका केली असून, “आजारपणातून उठल्या उठल्या शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली की, बारचालकांना करामध्ये सवलत देण्यात यावी. वीजबिलात सूट देण्यात यावी. खरंतर या सरकारचं मंदिरापेक्षाही मदिरेवर आणि बार चालकांवर प्रेम का आहे ?, याचं उत्तर आता कळायला लागलं आहे. कारण या सरकारचे निर्मातेच बारधार्जिणे आहेत, अशी टीका त्यांनी पवार यांच्यावर केली आहे.
शरद पवार बार धार्जिणे असल्यानेच या सरकारचे मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारवर जास्त प्रेम आहे.
पण @OfficeofUT, एकीकडे मठ-मंदिरांची वीज तोडणी करायची आणि तुम्हाला हप्ते मिळतात म्हणुन बारचालकांना वीजबीलात सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाहीत.@Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/cM0azoPiAs— Acharya Tushar Bhosale (@AcharyaBhosale) May 8, 2021
त्यांनी या पत्राच्या संदर्भ घेऊन ट्विटरवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, यात त्यांनी शरद पवारांवर मजूर, मराठा आरक्षण या मुद्द्यांवरून देखील टीका केली आहे. “शरद पवारांना ज्यांचं हातावर पोट आहे असे मजूर दिसले नाहीत. लोककलावंतांची उपासमार सुरू आहे ते दिसलं नाही. मंदिरांवर अवलंबून असलेले हार-फुलं विकणारे लोकं आणि त्यांचं हातावरचं पोट त्यांना दिसलं नाही. शेतकऱ्यांची वीजबिल सवलत त्यांना दिसली नाही. मराठ्यांचं आरक्षण त्यांना दिसलं नाही. पण बारचालकांचं वीजबिल आणि त्यांचं नुकसान लक्षात आलं”, असं ते म्हणाले आहेत.
कोविड-१९ ह्या जागतिक महामारीच्या दुसर्या लाटेने महाराष्ट्रात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोना संक्रमणाची साखळी तोडायची असल्याने पुनश्च संचारबंदीचा निर्णय राज्य शासनाला घ्यावा लागला. याचा परिणाम अनेक व्यवसाय-धंद्यांवर झाला असून हा वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. pic.twitter.com/wc1l8Fs6FG
— Sharad Pawar (@PawarSpeaks) May 7, 2021
Read Also :
- मराठा आरक्षणासाठी पाऊल पडणार पुढे? आघाडी सरकार “हा” मोठा निर्णय घेण्याची शक्यता
- ‘नागपूरचे 4 ऑक्सिजन टँकर्स गुजरातला हलवले, हे फडणवीसांना दिसत नाही का?’
- ऑक्सिजन न मिळाल्याने झाला, मराठमोळ्या ऑक्सिजन संशोधकाचा मृत्यू
- फडणवीसांनी साधला वजनदार मंत्र्यांवर निशाणा म्हणाले…
- “…तर ते माझ्या जीवाचं बरं-वाईट करायलाही मागे पुढे पाहणार नाहीत”, अँटिलीया जिलेटीन स्फोटकं प्रकरणाला नवे वळण